• Sat. Mar 7th, 2026
    ’10 लाख घरं दिली, 60 वसतिगृह सुरु केली’; ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही; म्हणाले, ‘मराठा समाजाला…’

    Cm fadanvis on obc reservation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांच्या केवळ घोषणा झाल्या होत्या, मात्र सत्तेत आल्यावर आम्ही 60 वसतिगृहे सुरू केली, असे स्पष्ट केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 ओबीसी वसतिगृह सुरु केले. 10 लाख ओबीसींना हक्काची घरं दिली. मी कधी जातीजातीमध्ये भेदभाव केला नाही, महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसींच्या वसतिगृहांची फक्त घोषणा होती, आम्ही ते पूर्ण केले आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही अठरापगड जातींना सोबत घेतले होते. त्यामुळे कोणत्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्र्‍यानी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.

    ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आम्ही सत्तेत आल्यावर 60 वसतिगृह सुरु केल्याची माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली आहे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही 10 लाख ओबीसांना हक्काची घरं दिली आहेत, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

    Maharashtra Times‘बदलापुरात 17000 बाहेरचे मतदार, मतदान करायला आलात, तर चोप देऊ’, शिंदेंच्या शहरप्रमुखाचा इशारा

    दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने जीआरकाढला होता. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्याचा हा जीआर आहे. त्यानंतर ओबीसी समाजआक्रमक झाला आहे. अनेक सभा मेळावे घेतले जात आहेत. सरकारने हा जीआर रद्द करावा अशी मागणी ओबीसींनी केली आहे.

    ओबीसींचे खरे कैवारी देवेंद्र फडणवीस आहेत- मंत्री बावनकुळे

    2 सप्टेंबरला मराठा आरक्षण ासंदर्भातला शासन आदेश सरकारने जारी केला आहे. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, हा आगेश फक्त मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांपूरता मर्यादित आहे. त्यावर काँग्रेस नेते राजकारण करत आहेत. ओबीसींचे आरक्षण गेले म्हणून आंदोलन करत आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे, असे सांगत आहेत. पण, ओबीसींचे खरे कैवारी हे देवेंद्र फडणवीसच आहेत असं बावनकुळे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

    बीडमधील आरोपी शिक्षक संदीप क्षीरसागरांचा राईट हँड; बजरंग सोनवणेंचं धनंजय मुंडेंना उत्तर

    दरम्यान, आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे व या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षणसंपल्याचा दावा केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा