Nandurbar Accident : सात मित्र मिळून अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी गेले होते. पण परत येताना काळाने घात केला. एकाच वेळी सात मित्राचा दुर्दैवी अंत झाला. ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील योगेश लक्ष्मण ठाकरे, हिरालाल जगन भील हे दोघे मित्र कामानिमित्त दररोज तालुक्यातील घोटाणे या गावी जात होते. तेथे कामानिमित्त त्यांची ओळख पवन गुलाब मिस्तरी, बापू छगन धनगर, चेतन पावबा पाटील, भूषण राजेंद्र गोसावी, राहुल गुलाब मिस्तरी या तरुणांशी झाली. दररोज भेटीगाठींमुळे त्यांची मैत्री फुलत गेली.
Nandurbar Accident : यात्रेहून परतताना मोठा अनर्थ, घाटात वाहन उलटून भाविकांचा अंत; एकाच गावातील पाच तरुणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी या सातही मित्रांनी ठरवलं की, दिवाळीमध्ये सातपुड्यातील अस्तंबा ऋषींच्या यात्रेला एकत्र जाऊया. तेथे जाण्याचं त्यांचं नियोजन ठरल्यानंतर ते अस्तंबा शिखरावर पोहोचले. जाताना जागोजागी त्यांनी एकत्र फोटो काढले. तेथे दर्शन घेतल्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी घरी परत येत असताना 18 ऑक्टोबर रोजी सकाळी ते सातही मित्र पिकअप (क्र. एम-39-ए.बी-2802) या वाहनात बसले. हे वाहन चांदशैली घाट उतरत असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भाविकांनी भरलेल्या मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या वाहनात तब्बल 35 जण बसलेले होते.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
घाटातील तीव्र वळणावर ब्रेक फेल झाल्याने गाडी सरळ घाटात 40 फूट खोल कोसळून दुसऱ्या टप्प्यात आदळली. यात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सात जिवलग मित्र पवन गुलाब मिस्तरी (24 वर्ष), बापू छगन धनगर (24 वर्ष), चेतन पावबा पाटील (23 वर्ष), भूषण राजेंद्र गोसावी (30 वर्ष) राहुल गुलाब मिस्तरी (22 वर्ष), हिरालाल जगन फडके, योगेश लक्ष्मण ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी मोबाईलमध्ये टिपलेले फोटो आणि त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरला. दीपोत्सवात या दोन गावांवर शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणार होता.

