• Sun. Mar 15th, 2026

    Raigad News : ‘भावंडं भेटली पण राज्याच्या हितासाठी राजकारणाच्या रंगमंचावर कोण प्रामाणिक हे…’; भरत गोगावलेंचं मोठं विधान

    Raigad News : ‘भावंडं भेटली पण राज्याच्या हितासाठी राजकारणाच्या रंगमंचावर कोण प्रामाणिक हे…’;  भरत गोगावलेंचं मोठं विधान

    Bharat Gogawale : दिपोत्सवाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर दोन्ही बंधू एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर मंत्री भरत गोगावले प्रतिक्रिया दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे दिपोत्सवाच्या कार्यक्रमात एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक वर्षांच्या कटुतेनंतर ठाकरेबंधू एकाच मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात “शिवबंधन पुन्हा जुळणार?” अशा चर्चांना ऊत आला आहे. या घडामोडीवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “ते दोघे भाऊ आहेत, हे खरं पण सध्याच्या परिस्थितीत त्यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. कालपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणारे आता एकत्र येतातयेत हेच राजकारणाचं वास्तव असल्याचं गोगावले म्हणाले.

    गोगावले पुढे म्हणाले की, “राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसतं. परिस्थिती आणि स्वार्थ यावर सर्व समीकरणं ठरतात. आज दोन्ही पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव) आणि राज ठाकरे यांची मनसे जनाधार गमावत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत असावेत.”
    Maharashtra Timesहुबळी एक्सप्रेस दगडफेक प्रकरण: अल्पवयीन आरोपीस अटक, पोलिसांच्या चोख कामगिरीचं प्रवाशांकडून कौतुक
    दिपोत्सवातील या अनपेक्षित भेटीला काही जण ‘भावनिक क्षण’ मानत असले, तरी अनेकांना यातून नव्या राजकीय समीकरणांचा अंदाज दिसतो आहे. येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाचे एकत्र येणं भाजप-शिंदे युतीसाठी नवी डोकेदुखी ठरू शकते, अशी चर्चाही आहे. मात्र गोगावले यांनी यावर टोला मारत सांगितलं, “सणाच्या निमित्ताने भावंडं भेटली, हे ठीक आहे; पण राज्याच्या हितासाठी राजकारणाच्या रंगमंचावर कोण किती प्रामाणिक आहे, हे जनता ठरवेल.”
    Maharashtra TimesRaigad Crime: बनावट नोटा प्रकरण! आरोपी भूषण पतंगेचा पोस्टमार्टम अहवाल समोर, अखेर आरोपीच्या मृत्यूचं कारण समजलं
    दरम्यान, राजकीय निरीक्षकांच्या मते, ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं केवळ भावनिक नव्हे, तर भविष्यातील सत्ता समीकरणांच्या शोधाचं प्रारंभिक पाऊल असू शकतं. दिवाळीच्या प्रकाशात उमटलेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करणार का? हा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा