राज्यात परतीचा पाऊस गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं. मागील आठवड्यात पावसाने उघडीप घेतली होती. मात्र काल बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळल्या. भर दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने अनेक दुकानकार, दिवाळीचं लहान-मोठं सामान विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी धावपळ झाली. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेला माल पावसात भिजल्याने मोठं नुकसान झालं. दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच सुरू होतील, मात्र त्याआधी मनसे आणि महाविकास आघाडीकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरही तारेशे ओढले आहेत.
Maharashtra Live News 16th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
