Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात यांना आपल्या पक्षात प्रवेश देत अजित पवारांनी मोठी खेळी खेळली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दौंड तालुक्यात अजित पवारांनी आपली ताकद दाखवत थेट भाजपला आणि आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का दिला आहे.
Pune News : दोन-चार नाही, ‘स्पेशल 15’ तगडे नेते भाजप प्रवेश करणार, दोन मित्रपक्षांनाही दणका१७ ऑक्टोबरला दौंड शहरासह तालुक्यातील अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबत भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहा यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत विविध चर्चांना उधाण आले होते.
स्वप्नील शहा यांच्या राजीनाम्यामुळे दौंड भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी ते शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाण्याची चर्चा होती. मात्र अखेर माजी आमदार रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विरवधल जगदाळे यांच्या संपर्कातून शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शहा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबतच आमदार राहुल कुल यांचे समर्थक नंदू पवार आणि अनेक स्थानिक पदाधिकारी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
‘भाजपमध्ये चालणारा एकपक्षीय आणि मनमानी कारभार पाहता आम्ही आता नवीन राजकीय दिशा निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो, पण पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंत सैनिक म्हणून काम करणार आहे,’ असं स्वप्नील शहा यांनी स्पष्ट केलं. तर, ‘आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी मैदानात उतरू.’ असं देखील शाह म्हणाले आहेत.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
दरम्यान, दौंड शहरात विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल कुल यांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्यात शहा आणि नंदू पवार यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या पक्ष बदलल्याने कुल यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना भाजपला हा मोठा राजकीय धक्का ठरणार, यात शंका नाही.

