Central Railway Local Train Delay : मध्य रेल्वेवरील बदलापूर, कर्जत, खोपोली या मार्गावरील लोकल ट्रेन दररोज उशिराने धावत आहेत. यामुळे नोकरदार प्रवाशांना कामावर वेळेवर पोहोचता येत नसून दररोज लेटमार्क होत असल्याचा त्याचा नोकरीवरही परिणाम होतो.
सकाळच्या वेळेत ट्रेन 45 मिनिटं उशिरा
सकाळच्या कार्यालयीन वेळेत ट्रेन तब्बल ४५ मिनिटं उशिरा धावत असल्याने संतप्त प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घालत तीव्र नाराजी, मोठा संताप व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऑफिसला ‘लेटमार्क’ होत असून, त्याचा नोकरीवर परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केल्या.
समृद्धी महामार्ग थेट ठाण्यात जोडला जाणार; भिवंडीतून कसा असेल मार्ग? विनाअडथळा मुंबईत प्रवेश करता येणार
लोकल ट्रेन वेळेत न काढता आधी एक्सप्रेसला मार्ग करुन दिला जातो
बदलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी सुटणारी लोकल मंगळवारी नियमित वेळेपेक्षा बराच उशिराने दाखल झाली. त्याआधी एक्स्प्रेसला प्राधान्य दिल्यामुळे ही लोकल खोपोलीहून येताना सायडिंगला थांबवण्यात आली, असा आरोप प्रवासी करत होते. परिणामी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घालत जाब विचारला. मंगळवारचा प्रकार हा अपवाद नसून, अनेक महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे. मात्र तरीही रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा प्रवाशांचा आरोप आहे.
Central Railway च्या फेऱ्या वाढणार, मात्र प्रवाशांना होणार मनस्ताप; फक्त CSMT Kalyan फास्ट ट्रेन?
बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत येथून दररोज लाखो प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या कमी असून, तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणेतील अडथळे आणि इतर रेल्वे कामांमुळे ज्या कमी ट्रेन आहेत, त्यादेखील लोकल वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संतप्त प्रवाशांनी याबाबत सोशल मीडियावरही आपला रोष व्यक्त केला असून, रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका केली आहे.

