पुण्यात एका महाविद्यालयातला संतापजनक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात प्रॅक्टिकल देत असताना टेक्निशियनने एका विद्यार्थिनीसोबत अत्यंत घृणास्पद असं कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
आदित्य भवार, पुणे : पुणे शिक्षणाचं माहेर घर मानलं जातं. पण याच शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामागे कारणही तसंच आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना एकीकडे प्रचंड वाढलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सणासुदीच्या काळात टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला होता. त्यानंतर गुंड निलेश घायवळच्या टोळीतील आरोपींनी दोन सर्वसामान्य नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता. हेही असे की थोडे आता एका महाविद्यालयात टेक्निशियनकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुण्यात अराजकतेचं कृत्य करणाऱ्यांना कोणतही भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
विशेष म्हणजे शिक्षणाच्या महेरघरात विद्यार्थिनी कॉलेज प्रशासनाकडून सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आहे. एकीकडे वाढती प्रेमी युगलांची संख्या पाहता विविध प्रकार घडतानाच्या घटना समोर येत असतातच. मात्र या शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचं काम हे त्या प्रशासनाचा असतो. पण असं असलं तरी कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉलेजच्या प्रशासनात असलेल्या एका इसमाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात एका नामांकित महाविद्यालयात प्रॅक्टिकल दरम्यान कॉलेजच्या टेक्निशियनकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अंबादास वैद्य असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.सं. ३१७/२०२५ बीएनएस अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा पर्वती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैद्य हा कॉलेजमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. घटनेच्या वेळी कॉम्प्युटर लॅबमध्ये दोन विद्यार्थिनी प्रॅक्टिकल देत होत्या. त्यावेळी आरोपीने कीबोर्ड दुरुस्त करण्याच्या बहाण्याने पीडित विद्यार्थिनीच्या डेस्ककडे जाऊन तिच्या अंगाला अनुचित स्पर्श केला. हा प्रकार पाहून तिची सोबत असलेली मैत्रीण घाबरून क्लासरूमच्या बाहेर धावली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला.
घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार कॉलेज प्रशासनाला तसेच आपल्या पालकांनाही सांगितला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतरही कॉलेज प्रशासनाने आरोपीविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. अंबादास वैद्य हा अद्याप कॉलेजमध्ये संगणक विभागात काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाची भूमिका आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा