• Thu. Mar 12th, 2026

    ‘मला तिच्याशीच लग्न करायचं आहे’; विवाहित महिलेसोबत प्रेमाला घरच्यांचा विरोध म्हणून तरूणाने केले असं काही…

    ‘मला तिच्याशीच लग्न करायचं आहे’;  विवाहित महिलेसोबत प्रेमाला घरच्यांचा विरोध म्हणून तरूणाने केले असं काही…

    Parbhani News: परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावात एका विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांना घरच्यांनी मान्यता न दिल्याने एका तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. माणिक कारभारी खोसे (वय २५) याने समाजाच्या विरोधाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले.

    धनाजी चव्हाण, परभणी: परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावात एका तरूणाने थेट रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका विवाहतेसोबतच्या प्रेम संबंधांना घरातल्यांनी मान्यता न दिल्यामुळे त्यानी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

    मृत तरुणाचे नाव माणिक कारभारी खोसे (वय 25) असून तो परभणीच्या सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी आहे. सासरच्या छळाला कंटाळून माहेरी आलेल्या एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. माणिकने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नातेवाईकांकडे विचारणा केली पण गावातील त्यांनी या लग्नाच्या नात्याला विरोध दर्शवला. त्यामुळे, निराश झालेल्या तरुणाने थेट रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (13 ऑक्टोबर) घडली आहे.

    Maharashtra Timesबातम्या वाचत नाहीस का तू? डेटवर गेलेला तरुण फसला, हजारो रुपये गमावून बसला; वाचा अन् सावध व्हा!

    नेमकं काय घडलं?

    काही वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या गावातील मुलीचा सासरी प्रचंड छळ होऊ लागला सासरच्या छळाला कंटाळून संबंधित तरूणी पुन्हा माहेरी आपल्या वडिलांकडे राहण्यासाठी आली. वडिलांकडे राहण्यास आल्यानंतर गावातीलच माणिक खोसे याचे त्या विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले. त्या काळात माणिक आणि त्या महिलेमधील नातं अधिक घट्ट झालं आणि त्यांनी विवाह कण्याचा निर्णय घेतला. विवाह करण्यासाठी माणिक ने आपल्या भावकी आणि नातेवाईकांना ही गोष्ट सांगितली. मात्र, नातेवाईकांनी माणिक आणि त्या महिलेच्या नातेसंबंधांना मान्यता दिली नाही त्यामुळे माणिक प्रचंड नैराश्यात गेला. रविवारी रात्री 10:30च्या सुमारास माणिक ने रवळगाव शिवारातील धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

    उद्धव ठाकरेंचा घरकोंबडा म्हणून उल्लेख, ज्योती वाघमारे बेक्कार बोलल्या

    घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केला. तपासानंतर, त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात आकास्मिक म़त्यूची नोंद केली आहे. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते आता नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. दरम्यान, गावात अद्यापही आपल्या विवाहबाह्यसंबंधांतून झालेल्या प्रेमविवाहाला समाज मान्यता देत नसल्याने लक्षात आल्यानंतर माणिकला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले असे सांगण्यात येत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा