• Fri. Mar 13th, 2026

    मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! MMRDA चा ‘हा मास्टरप्लॅन’ वाहतूक कोंडीपासून देणार कायमची सुटका

    मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! MMRDA चा ‘हा मास्टरप्लॅन’ वाहतूक कोंडीपासून देणार कायमची सुटका

    MMRDA Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने मोठा प्लॅन आखला आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल लवकरच तयार होईल.

    मुंबई: मुंबईकरांची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी MMRDA ने आखलेला नवा ‘भुयारी मास्टरप्लॅन’ मोठा गेमचेंजर ठरू शकतो. सकाळ-सायंकाळच्या पिक अवर्समध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या कोंडीमुळे मुंबईकरांचा तासन्‌तास प्रवासात वेळ जातो. या समस्येवर तोडगा म्हणून आता तब्बल 70 किमी लांबीचा भूमिगत मार्ग उभारण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

    कसा असेल हा भुयारी मार्ग?

    हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. पहिला टप्पा 16 किमी लांबीचा असून, वांद्रे-वरळी सी-लिंकपासून बीकेसीमार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडला जाणार आहे. या मार्गाचा उद्देश बुलेट ट्रेन स्थानक आणि विमानतळाशी जलद व सुलभ संपर्क साधणे आहे. हा मार्ग थेट कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे.Maharashtra TimesMumbai Metro: मेट्रो १ लवकरच ताब्यात? मार्गिकेच्या देखरेखीसाठी MMRDA स्वतंत्र कंपनी नेमणार

    दुसऱ्या टप्प्यात, 10 किमी लांबीचा रस्ता बांधला जाणार असून, तो मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांना विमानतळाशी थेट जोडेल. हा मार्ग Western आणि Eastern Express Highways यांना जोडेल.
    अंतिम टप्पा, 44 किमी लांबीचा असून तो दक्षिण मुंबईपासून बोरिवलीपर्यंत जाणार आहे. पुढे हा मार्ग ठाणे-बोरिवली टनेलशी जोडला जाण्याची शक्यता आहे.

    या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई, बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होईल. वाहतूक कोंडीचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होईल, असा MMRDA चा दावा आहे.

    प्रकल्पाचा अंदाजित खर्च

    या प्रकल्पासाठी लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल (Detailed Project Report) तयार केला जाणार असून, सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण उपक्रमाचा अंदाजित खर्च 17 हजार कोटी रुपये असणार आहे. या प्रकल्पाबद्दल चर्चा करण्यासाठी पहिली बैठक ऑक्टोबर 17 ला घेटली जाईल आणि संपूर्ण चर्चा 7 महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता आहे. हा भुयारी मार्ग जर बांधण्यात MMRDA ला यश आले तर मुंबईतील वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटणार आहे.

    Navi Mumbai Airport : विमानतळाचं उद्घाटन पण ‘दिबां’च्या नावाची घोषणा नाही, कोण होते दि. बा. पाटील ?

    घाटकोपर-ठाणे मार्ग

    दरम्यान, घाटकोपर ते ठाणे या 12.95 किमीच्या भूमिगत मार्गामुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतची सुमारे 700 झाडे छाटली जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकडून या संदर्भातील हरकती 16 ऑक्टोबरपर्यंत मागवल्या आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा