Nandurbar News : नंदुरबारमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विषारी सापाला पकडायला गेलेल्या सर्पमित्राला सापाने चावा घेतल्यानं त्याचा जीव गेला. मनीषच्या जाण्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शोकाकूल परिस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहादा तालुक्यातील वडाळी येथील सर्पमित्र मनिष मुकुंदा बैसाणे (वय 33) हा युवक मागील काही वर्षांपासून अनेक सापांना वाचवून नैसर्गिक अधिवासात सोडून नवीन जीवनदान देण्याचं कार्य करीत होता. काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडाळी गावाजवळील उभादगड येथील एकाच्या घरात सर्प निघाल्याची माहिती मिळाल्यानं मनीष त्याठिकाणी गेला. तेथे गेल्यावर त्याने सर्प पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळीच विषारी सर्पाने मनीषला चावा घेतला. त्यानंतर त्याला तात्काळ मोहिदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
गोळीबारानंतर पोलिसांनी नाशिकमधील नेत्याला उचललं, ऑफिसच्या झडतीत आढळलं छुपं भुयार; नव्या माहितीने उडाली खळबळ
परिसरात सर्पमित्र म्हणून मनीष सर्वपरिचित झाला होता. त्याच्या मृत्यूची वार्ता मिळताच नातेवाईक व कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मनिष हा परिसरात मनमिळावू व होतकरू असल्यानं त्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज रविवारी दुपारी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
रस्त्याने चाललेल्या मेंढ्यांच्या कळपात वाहन घुसलं
महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मेंढपाळ सहकाऱ्यांसह मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं वाहन थेट कळपात शिरल्यानं 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून ट्रकचालक पळून जात असताना गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नवापूर तालुक्यातील पानबारा गावाच्या शिवारात घडली.
Raigad Crime : 60 टक्के परतावा देण्याचं आमिष, कोट्यावधींचा घोटाळा, 100हून अधिक महिलांना लुबाडलं; रायगडमध्ये खळबळ
धुळे जिल्ह्यातील निजामपूर परिसरातील डोमकाणी येथील छगन अनिल पिसाळ व त्यांचे सहकारी कळप घेऊन महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने जात होते. त्याचवेळी नवापूर तालुक्यातील पानबारा गावाच्या शिवारातून भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्र. GJ 20 V 4159 जात असताना ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट मेंढ्यांच्या कळपात शिरला. या अपघातात 20 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी रोजी सकाळी घडली.

