• Thu. Jun 18th, 2026

    Kolhapur News : जेवण करू जा रे सगळे! जिवंतपणी सुष्मिताचं वडिलांनी गावाला बोलावत घातलं श्राद्ध, भलताच प्रकार चर्चेत, प्रकरण काय?

    Kolhapur News : जेवण करू जा रे सगळे! जिवंतपणी सुष्मिताचं वडिलांनी गावाला बोलावत घातलं श्राद्ध, भलताच प्रकार चर्चेत, प्रकरण काय?

    Father Shraddha ritual for daughter : बेळगाव जिल्ह्यातील नागराळ गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय सुष्मिता शिवगौड पाटील या तरूणीच्या वडिलांनी जिवंतपणीच श्राद्ध विधी केले. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. वडिलांनी सुष्मिताचा फोटो ठेवून पूजन केले. नेमक काय घडलं जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावातून एक धक्कादायक आणि अनोखी घटना समोर आली आहे. गावातील सुष्मिता शिवगौड पाटील (वय 19) ही तिचा प्रियकर विठ्ठल बस्तवाडे (वय 29) याच्यासोबत पळून गेली होती. यामुळे तिच्या वडिलांनी संताप व्यक्त करत तिचा जिवंतपणीच ‘श्राद्ध विधी’ केलाय. या वडिलांच्या मुलीबाबतच्या या कृतीमुळे गावासह पंचक्रोशीतील सारेच चकित झाले आहेत.

    विठ्ठल हा तहसील कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. तर सुष्मिता ही तिच्या कुटुंबातील चार बहिणींपैकी सर्वात धाकटी आहे. सुष्मिता आणि विठ्ठल यांनी एकमेकांवरील प्रेमामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे तिच्या वडिलांच्या मनाला प्रचंड वेदना आणि संताप झाला. मात्र सर्वात आधी त्यांनी सुश्मिताची शोधाशोध केली. सुश्मिता बेपत्ता झाली असल्याची तक्रार देखील शिवगौड यांनी रायबाग पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, नंतर मुलीने पळून जाऊन घराची मान आणि परंपरा मोडल्याची गोष्ट समजताच शिवगौड यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आपले मन कठोर करत त्यांनी सुष्मिता जिवंत असतानाही ‘श्राद्ध’ घालण्याचा निर्णय घेतला.

    फोटोपुजन आणि गावजेवण..

    शिवगौड पाटील यांनी गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना बोलावून सुष्मिताचा फोटो ठेवून पूजन केले. त्यानंतर एखाद्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करावी, अशा पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या विधीत त्यांनी कुटुंबातील सर्व नातेसंबंध तुटल्याचं आणि मुलीला घरातून बेदखल केल्याचं देखील जाहीर केलं.
    Maharashtra TimesKolhapur Crime : कोल्हापुरात चाललंय काय? तळसंदेनंतर पेठवडगावात धक्कादायक प्रकरण, बाथरुमध्ये नेऊन विद्यार्थ्याला मारहाण

    समाजमनावर परिणाम करणारी घटना..

    वडिलांकडूनच मुलीचे जिवंतपणे श्राद्ध ही घटना रायबाग पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात घडली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागातील अशी घटना समाजातील मानसिकतेवर, परंपरेवर आणि समकालीन व्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते. गावात आणि आसपासच्या भागात या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी याबाबत बोलताना वडिलांच्या मनाला झालेल्या वेदनांची जाणीव दर्शवली. तर काहींनी मुलीच्या जिवंत असतानाच ‘श्राद्ध’ करण्यात आलेल्या या कृतीला चुकीचं म्हटलं आहे.
    Maharashtra TimesKolhapur Crime : आंतरजातीय प्रेमामुळे गर्लफ्रेंडच्या घरच्यांचा मानसिक त्रास, छळाला कंटाळून बॉयफ्रेंडचं टोकाचं पाऊल
    दरम्यान सुष्मिताबाबत घडलेली ही घटना सामाजिक, नैतिक आणि मानसिक पैलूंबाबत व्यापक चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक प्रशासनाला या प्रकारावर संवेदनशील आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील बदलत्या सामाजिक संस्कारांना समजून घेऊन व्यक्ती स्वातंत्र्य आणि कुटुंब संस्कार यामध्ये संतुलन साधण्यासाठी या प्रकरणातून धडा घेण्याची आवश्यकता भासत आहे, हे मात्र नक्की.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा