Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: भाजपच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे वचन दिले आहे, ते पूर्ण होणारच, असा दावा बावनकुळे यांनी केला.
ते म्हणाले, ओबीसी समाजाने आरक्षण बचाव मोर्चा काढला; परंतु तो षडयंत्राचा भाग आहे. खरा कुणबी असलेल्यालाच कुणबी प्रमाणपत्र द्या, असे सांगितले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण गेले होते, परंतु फडणवीस सरकार आल्यावर ओबीसी आरक्षण परत मिळाले. ओबीसींसाठी महामंडळ स्थापन केले. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार होते. सत्तेत असताना त्यांनी काही केले नाही. आम्ही मात्र सगळे दिले. सुप्रीम कोर्टात आम्ही भांडलो.
नाशिकमध्ये सबुरीचा सल्ला; स्वबळाच्या निर्णयाबाबत घाई नको, मुख्यमंत्र्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन
पुढील काळात आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. ओबीसी मोर्चा नियोजित होता. त्यांनी तो काढला. अजूनही सरकार स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. ओबीसीसंदर्भात एकही चुकीचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. वंशावळ असेल, त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगतानाच ओबीसींची दिशाभूल करू नका, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी हैदराबाद अध्यादेशाचा चुकीचा अर्थ काढून प्रमाणपत्र देणार नाही, खाडाखोड झालेले प्रमाणपत्र चालणार नाही. सरकारने यासंदर्भात काळजी घेतल्याचे सांगितले.
फांद्या छाटताना मोठा अनर्थ; सिगरेटची ठिणगी पडून डिझेल कॅनचा स्फोट, नाशकात 6 जण होरपळले
‘सपकाळ यांची उंची नाही’
हर्षवर्धन सपकाळ फडणवीस यांच्याबद्दल बोलले, तरच मीडिया त्यांची दखल घेईल, असे त्यांचे मत असेल. कुठे देवेंद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची बोलण्याची उंची आहे का? काय बोलतात? असे सवाल बावनकुळे यांनी केले. पूर्णच काँग्रेस साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा दवडतात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे, असे बावनकुळे म्हणाले.

