• Fri. Mar 6th, 2026

    Pune Crime : ‘मोदी आलेले तेव्हा आम्ही तिघं बसलेलो, घायवळचा विषय निघाल्यावर फडणवीसांनी…’; अजित पवार यांचा मोठा खुलासा

    Pune Crime : ‘मोदी आलेले तेव्हा आम्ही तिघं बसलेलो, घायवळचा विषय निघाल्यावर फडणवीसांनी…’; अजित पवार यांचा मोठा खुलासा

    Neelesh Gaiwal Case Update : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचं प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली. घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला बंदूक परवानासाठी योगेश कदम यांनी शिफारस केली. अशातच या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजीत दराडे, पुणे : गुंड निलेश घायवळ याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बोगस कागदपत्र दाखवून पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकरणी आधीच अडचणीत सापडलेल्या निलेश घायवळ याच्या भावाच्या शस्र परवान्यावरून राज्यातलं राजकारण पेटलं आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनंतरही निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवाना नाकारल्याचं समोर आलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    निलेश घायवळ प्रकरणी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोललो असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. निलेश घायवळ प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे की, कुणीही असो कुठल्याही पक्षाचा असो जर त्याने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. सचिन घायवळ याच्या बंदुकीच्या परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केली होती. मात्र, तरीही त्यांना परवाना दिलेला नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. पुणे असो किंवा इतर कुठेही असो कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते आणि मी त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे.
    Maharashtra Timesलाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर ‘ही’ गोष्ट करावीच लागणार; मुदतीवर अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी असे मी तिघेही एकत्र होतो. त्यावेळीही निलेश घायवळ याचा विषय निघाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबतीत कुणाचंही ऐकायचं नाही हीच भूमिका घेतली. ज्यांनी चुका केल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करावी अशीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली. त्यामुळे जे कायदा हातात घेतील त्यांच्यावर कारवाई होईलच, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा