• Sat. Mar 7th, 2026

    छोटा चिंटू, चिकणी चमेली; अहिल्यानगरची सभा इम्तियाज जलीलांनी गाजवली, म्हणाले, “मुसलमानांना शिव्या दिल्या तर…”

    छोटा चिंटू, चिकणी चमेली; अहिल्यानगरची सभा इम्तियाज जलीलांनी गाजवली, म्हणाले, “मुसलमानांना शिव्या दिल्या तर…”

    Imtiaz jaleel: नगरमध्ये मुस्लिमांना शिव्या दिल्या जात आहेत, मात्र आम्ही गप्प बसावे का? असं म्हणत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी आणि पोलिसांवर टीका केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: आहिल्यानगरमध्ये एआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. पण, काही दिवसांपूर्वी उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या धरतीवर आहिल्यानगरमधली ही ३० तारखेला होणारी असदुद्दीन ओवेसी यांची सभा वातावरण तणावपूर्ण असल्याने रद्द करण्यात आली. मात्र या सगळ्यावर बोलताना एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नगरमधून सत्ताधाऱ्यांवर आणि पोलिस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    आम्ही आलो की तीन पानांचं लव्ह लेटर (नोटीस) पोलिसांकडून मिळतं

    आम्ही शांतता राखण्यासाठी सभा रद्द केली, पण कायदे फक्त आमच्यासाठीच का? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. आम्ही आलो की तीन पानांचं लव्ह लेटर (नोटीस) पोलिसांकडून मिळतं. त्यात लिहिलेलं असतं काय बोलावं काय नाही?, अशी टीका करत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला.Maharashtra TimesPune Crime: फरार निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुणे पोलिसांकडून परदेशातून परत आणण्याची प्रक्रिया, पण वकिलाचा वेगळाच दावा

    “स्टेजवरून मुसलमानांना शिव्या दिल्या तर….”

    पुढे बोलताना जलील म्हणाले, नगरच्या स्टेजवरून मुसलमानांना शिव्या दिल्या जात आहेत आणि आम्ही गप्प राहायचं? कायदे फक्त आमच्यासाठीच आहेत का? आम्ही बोललो की दोष आमचाच ठरतो. आज जर कोणाला राजकारण करायचं असेल तर मुसलमानांना शिव्या द्या, हा नवीन ट्रेंड झालाय.

    “पहिले छोटा चिंटू बोलत होता, आता ‘चिकणी चमेली’ बोलतेय”

    नगरमधील स्थानिक राजकीय नेत्यांवर जलील यांनी अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटले पहिले छोटा चिंट्टू बोलत होता, आता चिकणी चमेली बोलतेय. कुत्रे भुंकतात, पण चालणारा चालत जातो. मी नाव घेतलं नाही, पण समजणाऱ्याने समजून घ्यावं,असा खवचट इशारा देत त्यांनी संग्राम जगताप यांना टोला लगावला.

    महामार्गाचे डांबर आणि सिमेंट कोण खातं?

    नगर-संभाजीनगर महामार्गावरील कामांवर प्रश्न उपस्थित करत जलील म्हणाले, आता मी फडणवीसांना सांगतो एकदा त्या महामार्गावरून जा. मी १० हजार रुपये देतो, त्या महामार्गाचं डांबर आणि सिमेंट कोण खातं? फक्त खायची सवय झाली तर काय करणार?

    “आम्ही पैगंबरांच्या मार्गावर चालतो, हिंसेच्या नाही”

    २९ तारखेला जी घटना घडली ती दुर्दैवी होती. पण आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही.
    फक्त पैगंबरांचं पोस्टर लावून चालणार नाही त्यांच्या विचारांवरही चालायला हवं. ते पुढे म्हणाले निवडणुकीच्या तोंडावर काही जण हिंदू-मुसलमानांचे प्रश्न उकरून समाजात विष पेरत आहेत. पण, आम्ही दुसऱ्या धर्माचा विरोध करणारे नाही.

    सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!

    “कायदा सर्वांसाठी समान हवा”

    शांतता राखणं आमचं कर्तव्य आहे, पण कायदा सर्वांसाठी एकसमान हवा. धर्माच्या नावाने लोकांमध्ये भेदभाव करणे हे देशासाठी घातक आहे. आम्ही भारतात जन्मलो, हे आमचं भाग्य आहे, असंही जलील म्हणाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा