Virar Friends end life : दोघा तरुणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत आदित्यचे वडिल राज सिंग यांनी केला आहे.
विरारच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षकाला जोरात काही तरी पडल्याचा आवाज आला. त्यावेळी त्याला दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले होते.
याबाबत समजताच अर्नाळा सागरी पोलिसांनी धाव घेतली. मृत तरुणांकडे मोबाइल फोन नसल्याने त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांसमोर अडचणी येत होत्या. हे दोन विद्यार्थी ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकीवर असणाऱ्या क्रमांक पट्टीच्या आधारे पोलिसांनी मुलांची ओळख पटवली. शाम घोरई (२०) आणि आदित्य सिंग (२१) अशी या मुलांचे नावे आहेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी पाठवण्यात आले आहेत.
Y Puran Kumar Death : जीव देण्याआधी बायकोला 15 वेळा कॉल, IPS अधिकारी मृत्यू प्रकरणात नवी माहिती, जपानमधून मुलीला फोन केला अन्…
ही दोन्ही मुले नालासोपारा येथील आचोळे परिसरात राहात होती. ते दोघे नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही याबाबत तपास करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navi Mumbai Airport : विमानतळाचं उद्घाटन पण ‘दिबां’च्या नावाची घोषणा नाही, कोण होते दि. बा. पाटील ?
‘सखोल चौकशी करणार’
ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत आदित्यचे वडिल राज सिंग यांनी केला आहे. सोमवारी दुपारी त्याचे दोन मित्र आमच्या घरी आले होते. माझा मुलगा त्यांच्यासोबत वृंदावन उद्यानात जाऊन येतो, असे सांगून गेला होता. १० मिनिटे झाली तरी तो परतला नाही. आम्ही शोध घेतल्यानंतर पोलिस चौकीत तक्रार दिली होती, असे सिंग यांनी सांगितले.
Y Puran Kumar Death : आजही मनात ‘ती’ जखम ताजी; IPS अधिकाऱ्याने अखेरच्या चिठ्ठीत सगळं सांगितलं, पत्नी म्हणाली माझ्या…
तीन मुले एकत्र गेली होती. दोघांनी आत्महत्या केली, असे सांगत ही हत्याच असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी तिसऱ्या मुलाकडे आम्ही चौकशी करत आहोत. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, असे पोलिस उपायुक्त (परिमंडळ – ३) सुहास बावचे यांनी सांगितले.

