• Mon. Jun 15th, 2026

    मनसेनं हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर ‘ना घर का ना घाट का’ स्थितीत, भाजप प्रवेशासाठी प्रयत्न, मात्र….

    मनसेनं हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर ‘ना घर का ना घाट का’ स्थितीत, भाजप प्रवेशासाठी प्रयत्न, मात्र….

    Vaibhav Khedekar, raj thackeray, bjp : मनसेचे कोकणातील मोठे नेते वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रवेशाचा मुहूर्त टळला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील मोठा चेहरा म्हणजे वैभव खेडेकर . याच वैभव खेडेकरांची पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा सुरु असताना मनसेने त्यांची हकालपट्टी करण्याची संधी साधली व त्यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या आणि पदांवरुन बेदखल केले. राज ठाकरेंचे कट्टर मानले जाणारे वैभव खेडेकर गेले काही दिवस शिंदेसेनेच्याही संपर्कात होते. ते भाजप त प्रवेश करतील अशी शक्यता होती. पण, खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी होऊन अनेक दिवस लोटले असले तरीदेखील त्यांचा भाजप प्रवेश झालेला नाही.

    यामागचं नेमकं कारण काय हे अजून कळू शकलेलं नाही. वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश न झाल्याने त्यांची गत आता ‘ना घर ना घाट का’ अशी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या अधिकच्या माहितीनूसार पक्षात प्रवेश करण्यासाठी मुंबईमध्ये वैभव खेडेकरांना भाजपचं अधिकृत असं निमंत्रणही मिळालेलं नाही. दरम्यान, असंही कळतंय की, तीनवेळा पक्षप्रवेश ठरलेला असताना प्रत्येकवेळी मुहूर्त मात्र टळला आहे. त्यामुळे वैभव खेडेकरांनी आता स्वतःच पुढाकार घेत मुंबई गाठली आहे. त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर ते प्रवीण दरेकरांनाही भेटले आहेत.
    Maharashtra Timesपंतप्रधान मोदी यांनी भाषणात घेतलं दि. बा. पाटील यांचं नाव अन् टाळ्यांचा कडकडाट… नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी काय घडलं?

    या भेटींमागचं नेमकं कारण अद्यापतरी समोर आलेलं नाही आहे, त्यामुळे वैभव खेडेकरांना भाजपत प्रवेश मिळण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मनसेत असताना मोठा मान मिळत असलेले व राज ठाकरेंचा विश्वास संपादन केलेले वैभव खेडेकर हे त्यांच्या राजकीय भवितव्याच्या गर्तेत अडकले आहेत.

    या विमानतळाला १०० टक्के दी. बा. पाटील यांचच नाव असणार आहे, संजीव नाईकांचं ठाम मत!

    दरम्यान, वैभव खेडेकरांबद्दल सांगायचं झाल्यास मनसेच्या स्थापनेपासूनच ते राज ठाकरेंबरोबर राहिले होते. वैभव खेडेकरांनी खेड नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा फडकावला होता. ते खेडचे नगराध्यक्षही राहिले आहेत. यंदा मात्र खेडचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव राहिल्याने खेडेकरांना पदाबाबत फटका बसला असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

    महाराष्ट्र डेस्क

    लेखकाबद्दलमहाराष्ट्र डेस्कमटा महाराष्ट्र डेस्क एक अनुभवी आणि जागरूक टीम आहे. ही टीम राज्य, जिल्हा, शहर आणि गाव पातळीच्या बातम्यांसह राज्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या, विकास योजनांचा आढावा, स्थानिक राजकारणातील बदल आणि सांस्कृतिक घडामोडींचे तटस्थ व विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच या डेस्कचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बातमीला संदर्भासह सादर करून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे हा या टीमचा नेहमीच प्रयत्न असतो.… आणखी वाचा