वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबईत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, निवडणुका झाल्या तर बदल नक्की घडेल अशी स्थिती आहे. बिहारमध्ये वंचित घटक बाजूला केल्याने इंडिया आघाडीची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीने मागच्या निवडणुकीत गाढवपणा केला नसता…तर केंद्रात भाजपचे सरकार दिसले नसते. भाजप आता लंगड झालं आहे मात्र…काहीजण या चोरीच्या पक्षातून त्या चोराच्या पक्षात उड्या मरतात इतकंच राहील आहे.