• Tue. Mar 10th, 2026
    शालिनीशीच दोनदा लग्न, दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा एकत्र यायचं होतं! मुंबईत Ex-Air Hostess चा खून, मृत्यूच्या तीन तास आधी…

    Mumbai Ex Air Hostess Murder : निवृत्त केबिन क्रू सदस्य असलेला तिचा 60 वर्षीय विभक्त पती राजीव लाला याला अटक करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : 56 वर्षीय एक्स-एअर हॉस्टेस शालिनी देवी यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी निवृत्त केबिन क्रू सदस्य असलेला तिचा 60 वर्षीय विभक्त पती राजीव लाला याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 27 सप्टेंबर रोजी पत्नीच्या हत्येपूर्वी आरोपी राजीव पवई येथील शालिनीच्या फ्लॅटबाहेर तीन तास शांतपणे वाट पाहत उभा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. तिने दरवाजा उघडताच तो जबरदस्ती आत घुसला. त्यानंतर दोघांमध्ये तीन तास जोरदार भांडण झालं. त्याचे आवाज शेजाऱ्यांच्या कानांवरही पडले. अखेरीस लालाने तिचा गळा दाबून खून केला.
    Maharashtra TimesMumbai Crime : अगं माझं लग्न झालंय… मुंबईकर वकिलाला तरुणीने जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेवायचाही प्रयत्न, शेवटी नको तेच घडलं
    पत्नीने पुन्हा एकत्र येण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात खून घडल्याचे राजीव लालाने पोलिसांना सांगितले. मात्र शालिनी देवीचा मित्र आणि वकिलाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. खुनापूर्वी तीन दिवस आधी शालिनीने लालाविरुद्ध तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर तिचा जीव वाचला असता, असं वकिलांचं म्हणणं आहे. पोलिसांनी मात्र हे घरगुती वादाचे प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.

    आमदार पठारे धक्काबुक्की प्रकरणी पत्रकारांचा प्रश्न, शरद पवारांनी काय दिलं उत्तर

    राजीव लाला आणि आर. शालिनी देवी हे दोघेही निवृत्त केबिन क्रू सदस्य होते. शालिनी देवी वकीलही होत्या. दोन तासांच्या भांडणानंतर राजीवने शालिनी देवीचा गळा दाबून खून केला. त्यांच्या शरीरावर 11 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. लालाने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की, हा खून पूर्वनियोजित नव्हता. पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा एकत्र येण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात हे घडले.
    Maharashtra TimesHeart Attack : दहावीतल्या भावाचा मृत्यू, धक्क्यातून सख्ख्या दादाचंही हार्ट अटॅकने निधन, गर्भवती वहिनी जागेवरच कोसळून…
    राजीव आणि शालिनी यांनी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा एकदा लग्न केलं होतं. पण दुर्दैवाने, सुमारे 15 वर्षांपूर्वी ते पुन्हा विभक्त झाले होते. शालिनी देवीचे मित्र आणि वकील अजित जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी दावा केला आहे की, 27 सप्टेंबर रोजी झालेल्या खुनापूर्वी तीन दिवस आधी, म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी, त्यांनी लालाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. जाधव यांच्या मते, पोलिसांनी त्यावेळी तातडीने कारवाई केली असती तर शालिनी देवीचा जीव वाचू शकला असता.

    अजित जाधव यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत लालाविरुद्ध किमान चार NC (non-cognisable) गुन्हे दाखल झाले होते. जाधव यांनी लालाच्या वागणुकीबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “कामाच्या ठिकाणी गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, या भीतीपोटी त्याने शालिनीचा पाठलाग करणं आणि तिला त्रास देणं थांबवलं होतं, पण निवृत्त होताच तो निडर झाला. शालिनी आणि मी 24 सप्टेंबर रोजी पोलिसांकडे गेलो होतो, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत होतो, कारण आम्हाला तिच्या जीवाला धोका असल्याची भीती होती.”

    यावर पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. पोलिसांनी सांगितले की, शालिनी देवीने लालाविरुद्ध नियमितपणे घरगुती तक्रारी दाखल केल्या होत्या. पोलिसांनी त्याला अनेक वेळा ताकीद दिली होती. 24 सप्टेंबर रोजीच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी राजीवला ‘chapter proceedings’ (संभाव्य त्रास थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय) सुरू करण्याची धमकी दिली होती. एका पवई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “हे घरगुती वादाचे प्रकरण होते, मात्र त्याचा शेवट खुनाने झाला” आरोपी राजीव लाला यास आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा