नांदेड शहरातील गोदावरी नदीच्या पुरामुळे शेकडो घरे पंधरा दिवस पाण्याखाली होती.घरातील अन्न, साहित्य, कपडे आणि मुलांचे शालेय साहित्य पूर्णपणे खराब झाले. श्रावस्ती नगर, तेहरा नगर, दुलेशाह रहेमान नगर, नोबेल कॉलोनी, नवीन श्रावस्तीनगर…गाडीपुरा, देगलूर नाका यासह अनेक कुटुंबियांना महापालिकेच्या निवारास्थळी जावे लागले. पूर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी नागरिकांची चिंता कायम आहे.यावेळी बोलताना पूरग्रस्त महिलांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे.