• Sun. Mar 8th, 2026
    शिवसेनेचा स्वबळाचा नारा? उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये कार्यशाळा

    Eknath Shinde Nashik Visit: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून, स्वबळाचाही नारा दिला जाणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    eknath shinde news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणूक भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्यानंतर शिवसेना शिंदे गटानेही स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ५) पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बुथप्रमुख कार्यशाळा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

    पहिल्या टप्प्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. तर जानेवारीत महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातही नाशिक, मालेगाव महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जोर लावला आहे. भाजपने महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.
    Maharashtra Timesपोलिस आयुक्तांनी अखेर भाकरी फिरवली! नाशकात 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे झाली नेमणूक?
    प्रचाराचा नारळ फोडणार

    महापालिकेसाठी भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला असून, मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षातून इनकमिंग सुरू केले आहे. त्यामुळे नाशकात भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडूनही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करीत आज सायंकाळी सात वाजता हॉटेल डेमोक्रसी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचाही नारळ फोडला जाणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतची घोषणा या मेळाव्यात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
    Maharashtra Timesकंपनीतील मॅनेजरचे वॉचमनच्या बायकोसोबत अफेअर असल्याचा संशय; दोघांवर चाकूने वार, आरोपीला अटक करताच…
    …तोपर्यंत ठाकरे बंधू एकत्र येणे अशक्य – गुलाबराव पाटील
    जळगाव : राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यायलाच पाहिजे. पण, संजय राऊत नावाचा अडथळा जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हे सख्खे भाऊ एकत्र येतील असे मला वाटत नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा भरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र वितरणासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आले होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या अनुकंपा भरतीच्या निर्णयाचे कौतुक करीत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आरोपांवर बोलण्यास गुलाबराव पाटलांनी नकार दिला. मात्र, यावरून संजय राऊत यांनी रामदास कदमांना दिलेल्या इशाऱ्यावर पाटील संतापले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा