• Sat. Mar 7th, 2026

    Shakti Cyclone in Arabian Sea : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; पालघरसह ‘या’ शहरांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन

    Shakti Cyclone in Arabian Sea : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; पालघरसह ‘या’ शहरांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन

    Cyclone Shakhti IMD Alert in Maharashtra : हवामान खात्याने ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार असल्याचं सांगत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्हे, तसंच मराठवाडा, विदर्भातही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नमित पाटील, पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगड , सिंधुदुर्ग येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील किनारपट्टी भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. शक्ती चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचं, त्याचप्रमाणे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आलं आहे.

    पालघर जिल्ह्यात 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 7 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने नवीन लागवड केलेली फळझाडे तुटून पडू नयेत मयासाठी काठीने आधार द्यावा. काढणीस तयार झालेल्या उन्हाळी भाताची कापणी शक्यतो 10 ऑक्टोबरनंतर पावसाचा अंदाज बघून करावी, असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड मार्फत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

    Maharashtra TimesNashik Crime : कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पोलिस स्टेशनवर दगडफेक, गाडीच्या काचाही फोडल्या, प्रकरण काय?

    समुद्रात घोंघावतंय शक्ती चक्रीवादळ

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. या हंगामातील हे पहिलं चक्रीवादळ असून ते शुक्रवारी तीव्र झालं आहे. शनिवारी ते अधिक तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    Maharashtra Timesगोरेगाव ते मुलुंड लिंक रोड सुस्साट, ७५ मिनिटांचा प्रवास २५ मिनिटांपर्यंत; दिंडोशी, रत्नागिरी जंक्शन, फिल्मसिटी… कसा असेल मार्ग?

    शक्ती चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा वाहू शकतो. त्याशिवाय चक्रीवादळाचा वेग, उंच लाटा यामुळे समुद्रातील परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली असून स्थलांतराच्या उपाययोजनांचीही तयारी केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा