Sanjay Raut News : दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांना नार्को टेस्ट करावी असं आव्हानही कदम यांनी केले होते. अशातच ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर बोलताना कदमांना इशाराच दिला आहे.
बाळासाहेबांनंतर सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलीत. उद्धव ठाकरेंनी साहेबांसोबत काम करणाऱ्यांना सन्मानाने वागवलं. महाराष्ट्र आणि मराठी माणूस अशा लोकांवर थूंकत आहे. पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस काहीही विधान करू शकतो, असंही राऊत म्हणाले.
मोठी बातमी : बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ, उद्धवजींनी आदित्य ठाकरेंची शपथ घ्यावी, रामदास कदमांचं ओपन चॅलेंज
रामदास कदम काय म्हणाले?
दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा उद्धव ठाकरे यांनी छळ केला हे मी जबाबदारीने आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊदेत, मी उद्धवजींना विचारलं की शिवेसनाप्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा ते आमचे दैवत आहेत. तेव्हा उद्धवजी मला बोलले की, रामदास भाई मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे की, त्यांनी हाताचे ठसे कशासाठी घेतले. दोन दिवस कोणालाही वरती पाठवत नव्हते, शिवसेनाप्रमुखांसारखा आजारी असताना डॉक्टर डिक्लेअर करतात त्यावेळी मला डिक्लेअर करावं लागलं होतं, मी पुढे गेलो होतो. मी इतके वर्षे बोललो नाही पण मी भाषणावेळी ओघाओघात बोलून गेलो. उद्धव ठाकरे ज्या प्रकार स्टेटमेंट देत आहेत ते काही वाघ नाहीयेत, मुखवटा लावलेला असून लांडगा आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.

