Nashik Youth Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नाशिकमधील गुरेवाडी भागात एका तरुणाची तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली आहे. कृष्णा ठाकरे याच्यावर गोरेवाडी भागात तीन हल्लेखोरांनी कुरापत काढून धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून कृष्णा यास मृत घोषित केलं.
नाशिक रोड भागातील गुरेवाडी या ठिकाणी नवरात्रच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या रात्री दांडिया खेळत असताना किरकोळ वादातून एका टोळक्याने कृष्णा ठाकरे या युवकावर कोयता आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णा गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित मोईन शेख, चिराग उर्फ मोगिनी बारसे, यश बारसे आणि प्रकाश उर्फ आशू बारसे यांना ताब्यात घेतलं.
ऑन ड्युटी असताना दारु प्यायले, गुन्हा दाखल होताच मानसिक तणावात; एसटी ड्रायव्हरने बसमध्येच आपलं आयुष्य संपवलं
हत्येचं कारण अस्पष्ट
कृष्णा ठाकरे याची हत्या का करण्यात आली? याचं कारण समजू शकलेलं नाहीय. मात्र, गरबा खेळताना किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून सखोल तपास करत आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
Raigad Crime : हातातून घराची चावी हिसकावली, छातीवर बसून जबरदस्ती; दसऱ्याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
यानंतर नाशिक शहरातील तिघंही आमदारांनी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील गुन्हेगाराची माहिती दिली होती. यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली होती. यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होण्याची अपेक्षा असताना पुन्हा शहरात हत्या झाल्यानं शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

