Ratnagiri News : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरु असतानाच, अंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि जलद होणार आहे. यासाठी सध्या एका खासगी एजन्सीकडून या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
एकीकडे, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरु असतानाच, अंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. हा घाट हा साधारण सात किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळण्याचे प्रकारही या घाटात घडतात.
Satara News : सैन्यात भरतीचं स्वप्न अधुरं, मित्रांसोबत चालताना शेताच्या कुंपणातून विजेचा झटका, 18 वर्षीय तरुणाचा तडफडून मृत्यू
या पार्श्वभूमीवर, घाटातील धोकादायक भाग कायमस्वरुपी वगळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सर्वेक्षणानंतर बोगद्याची लांबी, रुंदी आणि तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करण्यात येईल. या आराखड्यानंतर अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरी मिळाल्यावर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखून घाटातील वन्य प्राणी, राष्ट्रीय उद्यान आणि जंगल परिसराचा विचार करून हा प्रकल्प अहवाल येणार निश्चित करण्यात येणार असून त्यानुसारच याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.
Pune News : पिंपरीत लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; फायर ब्रिगेडने बाहेर काढलं, पण काळाने गाठलं!
कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडीचे ग्रहण कायम
दुसरीकडे कल्याण-शिळ मार्गावर सुरू असलेली मेट्रोची कामं, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीचं ग्रहण कायम आहे. वाहन चालक या कोंडीत तास न् तास अडकत असल्याने इंधन आणि वेळेचा अपव्यय होत आहेच. शिवाय त्यांना प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. परिणामी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पूरग्रस्तांना मदत; सुप्रिया सुळेच्यां उपस्थितीत मदत रवाना
कल्याण-शिळ या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणासह काँक्रीटीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु ही कोंडी फुटण्याची चिन्हं अद्याप दिसत नाहीत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सिमेंट उखडल्याचं सांगितलं जात आहे. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पिलर उभारण्यासाठी निम्म्याहून अधिक रस्ता बॅरिकेडने बंद करावा लागत आहे. परिणामी अरुंद रस्त्यातून बाहेर पडताना वाहन चालकाची मोठी दमछाक होत आहे.

