Dharashiv News : धाराशिवमध्ये २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अतिवृष्टी, कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी चिंतेत असून असा टोकाचा निर्णय घेतला जात असल्याचं चित्र आहे.
धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. उभी पिकं गुडघाभर पाण्यात गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. वाढतं कर्ज, शेतीत होणारं नुकसान, नापिकी, आस्मानी संकट यामुळे शेतकऱ्याला कुठलाच पर्याय दिसत नसल्याचं चित्र आहे. याच विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. धाराशिव जिल्ह्यात 24 तासांत दोन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.
बाप-लेक शेतात गेले आणि अनर्थ घडला, तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; दसऱ्याच्या दिवशी कुटुंब शोकसागरात
पोपट केशव पवार यांनी गुरुवारी सकाळी स्वतःच्या राहत्या घरात विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवलं. पोपट पवार यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाचा बोजा होता. यावर्षी झालेली अतिवृष्टी, शेतात झालेलं नुकसान आणि वाढतं कर्ज यामुळे पोपट पवार यांनी टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला.
Jalgaon News : देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले, वाटेत पती-पत्नीसोबत अनपेक्षित घटना; दुचाकीसमोर गाय आली आणि… महिलेचा दुर्दैवी शेवट
अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास गेला…शेतकरी हतबल, सरकारकडे काय केली मागणी?
पोपट पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पोपट पवार यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. लागोपाठ झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

