• Sat. Mar 7th, 2026

    कार थांबली, दरवाजा उघडला आणि सुरू झाला मृत्यूचा खेळ… मुलांसमोरच कोयत्याच्या वारांनी रिक्षाचालकाचा खून

    कार थांबली, दरवाजा उघडला आणि सुरू झाला मृत्यूचा खेळ…  मुलांसमोरच कोयत्याच्या वारांनी रिक्षाचालकाचा खून

    Man stabbed in front of kids: छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली एका रिक्षाचालकाचा त्याच्या मुलांसमोर कोयता आणि तलवारीने निर्घृण खून करण्यात आला. सय्यद इम्रान सय्यद शकील (वय ३८) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

    म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात बुधवारी रात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेने सगळीकडे खळबळ माजली आहे. एका रिक्षाचालकाचा त्याच्या दोन चिमुकल्या मुलांसमोरच कोयता आणि तलवारीच्या वारांनी निर्दयीपणे खून करण्यात आला. मुलांच्या डोळ्यांसमोर वडिलांचा झालेला हा भीषण अंत त्यांच्या मनावर कायमची जखम करून गेला आहे.

    मृत रिक्षाचालकाचे नाव सय्यद इमरान सय्यद शकील (वय 38, रा. साधाचनगर, रेल्वे स्टेशन परिसर) असे असून, तो बुधवारी रात्री आपल्या 11 वर्षीय मुलगी आणि आठ वर्षीय मुलाला घेऊन घरी जात होता. रात्री आठच्या सुमारास रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली त्याच्या रिक्षेला एका चारचाकी वाहनाने अडवले.
    Maharashtra Timesपूर ओसरल्यावर मोहटादेवीला जा, मावशीने नकार दिल्याचा राग, मायबापाविना वाढलेल्या लेकराने लिंबाच्या झाडावर आयुष्य संपवलं
    क्षणात कारमधून चार-पाच जण खाली उतरले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट इम्रानवर कोयत्याने हल्ला केला. पहिल्याच वारात त्याचा हात मनगटापासून तुटला. त्यानंतर मागून डोके आणि मानेवर कोयता व तलवारीने सपाप वार करत इम्रानला रक्ताच्या थारोळ्यात लोटले. काही क्षणांतच त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मात्र हल्ल्यानंतर आपल्या गाडीत बसले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

    खून जुन्या वादातून?

    या घटनेमुळे परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रात्रीची वेळ असूनही त्या रस्त्यावर वर्दळ होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर आणि सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत मृत इम्रानवरही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून समजले आहे. हा खून जुन्या वादातून घडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

    मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन

    आरोपींचा शोध सुरू

    या हत्येनंतर पोलिसांनी संशयित आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तातडीने तीन विशेष पथके तयार करण्यात आली असून, आरोपींना पकडण्यासाठी सर्वत्र जाळे पसरवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    एका बापाचा जीव दोन निष्पाप मुलांच्या डोळ्यांसमोर घेतला गेला आणि त्यांनी असहाय्यपणे सर्व पाहिले. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.