Raigad man ends life: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरू आहे. नुकताच कुणाल मनोज चौधरी या छत्तीसगडच्या तरुणाने गळफास घेऊन जीव दिला. काही दिवसांपूर्वीच एका भांडी विक्रेत्याने आत्महत्या केली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव कुणाल मनोज चौधरी (वय वर्षे 30) असे आहे. कुणाल मूळचा छत्तीसगढ रहिवासी असून, तो काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात वास्तव्य करत होता.पहाटेच्या सुमारास, घरात इतर कोणीही नसताना कुणालने एक नायलॉनची रश्शी घेतली आणि घराच्या पत्र्याखाली असलेल्या अँगलला ती बांधून स्वतःला गळफास लावून घेतला.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात डोंबाऱ्याचा खेळ! शिंदेंच्या आमदाराला तटकरेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
कुणालच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी तातडीने महाड एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधला गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, आत्महत्येमागील नेमके कारण लवकरात लवकर उघड होईल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वर्षानुवर्षे जास्त असून, कोकणात ही संख्या तुलनेने कमी होती. मात्र आता कोकणातसुद्धा आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुणांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. बहुतेक वेळा नैराश्य, प्रेमभंग, दारूच्या व्यसनातून होणारे मानसिक असंतुलन, किंवा बेरोजगारी या कारणांमुळे अशी पावले उचलली जातात. परिणामी, मृत्युमागील खरे कारण ओळखणे कठीण ठरते. कुणालच्या या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे.
