भारताच्या विजयानंतर कोल्हापुरात नवरात्रोत्सवातच साजरी झाली दिवाळी
भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप स्पर्धेत अंतिम सामना मोठा चुरशीचा ठरला. या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप भारताने आपल्या नावे करताच कोल्हापुरात जल्लोषाला सुरुवात झाली. रविवारी रात्रीचा हा कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, तिरंगा आणि भगवा ध्वज लहरवत युवक-युवतींनी विजयाच्या घोषणा केल्या. अवघ्या काही मिनिटांत चौकात हजारोंची गर्दी उसळली.
