• Fri. Mar 6th, 2026
    Anil Deshmukh: धान, संत्री, सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    Anil Deshmukh: नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीच्या झाडांवर बुरशीचा रोग आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन नुकसान झाले आहे.

    deshmukh fadnnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, नागपूर: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये धान, संत्रा व मोसंबीच्या फळगळीचे तसेच सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’मुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या पिकांच्या नुकसानीचाही पंचनाम्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

    चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात धानाचे पीक अनेक दिवसांपासून पाण्याखाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातून पाणी निघत नाही. पाणी साचून राहिल्याने धानाचे पीक काही ठिकाणी सडले आहे. तसेच अजूनही सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धानाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
    Maharashtra TimesHarshwardhan Sapkal on RSS : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे संघाला थेट आव्हान, ‘मनुस्मृतीची होळी करून संविधानाचा स्वीकार करा’
    सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव असल्याने ते पीकही नष्ट झाल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनही, कोणतीही सरकारी यंत्रणा अद्याप पंचनामे करण्यासाठी आलेली नाही. त्यामुळे, नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून संत्रा, मोसंबी, तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली असल्याचा उल्लेख अनिल देशमुख यांनी पत्रात केला आहे.
    Maharashtra TimesRavindra Chavan: हजार घरांपर्यंत पोहोचा, पालिकेचे तिकीट मिळवा; भाजप प्रदेशाध्यक्षांची कार्यकर्त्यांना ‘ऑफर’
    जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. यात विदर्भातील ६ लाख ७५ हजार ८२०.०६ हेक्टरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांकरिता ५८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, यात नागपूर जिल्ह्याचे केवळ एक हजार ८३.९९ हेक्टरमध्ये नुकसान दाखवले असून, त्यासाठी फक्त ९५.९७ लाख मंजूर केले आहेत. ऑगस्ट २०२५ नंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, पण संत्रा, मोसंबी व सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाहीत, असेही देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा