• Fri. Mar 6th, 2026
    Buldhana News : तिघे सोबत घराबाहेर पडले, दोघांचा बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून मृत्यू; आई-वडिलांचा हंबरडा

    Buldhana Two Youths Die of Suffocation : बुलढाण्यामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगाव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना काल गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. साजीदखान जलीलखान (वय 22) आणि मुस्ताकखान जब्बारखान (वय 38) अशी मृतांची नावे आहेत. तर आरिफखान बशिरखान (वय 38) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही मलकापूर येथील पारपेठ प्रभागातील रहिवासी आहेत.

    काल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता हे तिघे घरुन बाहेर पडले होते. रात्री साडेदहा वाजता पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तर मध्यरात्रीचे सुमारास गंभीर जखमी आरिफखान याला तातडीने मलकापूर येथील आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही मृतदेहांना तपासानंतर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात कसा घडला याबाबत वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.

    Maharashtra TimesJalgaon Accident : भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं, आई-वडिलांसह लेकीला चिरडलं; क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत

    याप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यानं सुरक्षा काटेकोरपणे राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे. इंधन टाक्या व बायोडिझेल प्रकल्पांजवळ योग्य वायुविजन, ऑक्सिजन लेव्हल अलर्ट यंत्रणा, तसेच सुरक्षित वेशभूषेसह कामगारांना आत प्रवेश देण्याचे नियम बंधनकारक करणे आवश्यक आहे. कामगार व इतर कर्मचाऱ्यांना नियमितपणे आपत्कालीन परिस्थितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणे, अग्निशमन व वैद्यकीय पथक सतत उपलब्ध ठेवणे यावर भर देणे गरजेचे आहे. शासनानेही अशा प्रकल्पांची वेळोवेळी सुरक्षा तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक ठरत आहे. सुरक्षा उपाय न पाळल्यामुळे निष्पाप तरुणांचे जीवन धोक्यात जाणे ही धोक्याची घंटा असून, अशा घटना आळा घालण्यासाठी प्रशासन, पंप मालक व स्थानिक यंत्रणा यांनी जबाबदारपणे पावले उचलण्याची वेळ आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा