Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गांजा विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विमानतळ पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
त्यानंतर तपास पथकाने पथकातील कर्मचारींसह सापळा रचून तीन महिलांना रंगेहात पकडले. अटक केलेल्या महिलांची नावे अशी आहेत –
सोनाबाई अंकुश पवार (वय ५०, रा. खुळेवाडी, पुणे)
सुवर्णा अशोक पवार (वय २५, रा. खुळेवाडी, पुणे)
शालन कांतीलाल जाधव (वय ४५, रा. खुळेवाडी,
Jalgaon Accident : भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं, आई-वडिलांसह लेकीला चिरडलं; क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत
या महिलांच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७४/२०२५, भा.दं.वि. अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले हे करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशानुसार, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व गुन्हे निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी सना शेख, लालु कन्हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पुण्यात निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक धक्का, युवा नेता राष्ट्रवादीच्या गळाला; अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
वाहतूक कोंडीवर तोडगा
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गेल्या मंगळवारी (२३ सप्टेंबर) वाकड आणि हिंजवडी येथे पाहणी दौरा केला. यापूर्वी केलेल्या पाहणीत आयुक्तांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्याबाबत आढावा घेऊन सध्याच्या वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. त्यामध्ये वाकड ते हिंजवडी या मार्गावर सकाळी तीन मार्गिका, तर हिंजवडी ते वाकड या मार्गावर सायंकाळी तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा
