• Sun. Jun 14th, 2026

    ‘एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्याविना राहणार नाही’, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा

    ‘एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्याविना राहणार नाही’, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा

    Ahilyanagar Dattatray Bharane Tour : ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी, याबाबत दुमत नाही. पण, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत योग्य निर्णय घेऊ, राज्य सरकार कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही’, असं राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांवी ग्वाही दिली.

    अतिवृष्टी शेती पंचनामा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, अहिल्यानगर : ‘अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असले तरी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनामे 10 दिवसांत पूर्ण करून मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल,’ अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. शेवगाव तालुक्यातील भगूर आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना भरणे बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला. या दौऱ्यात आमदार मोनिकाताई राजळे, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह महसूल, कृषी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ७.४९ लाख एकर शेतीचे नुकसान

    कृषीमंत्र्यांनी सांगितलं की, आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 7 लाख 49 हजार एकर शेती क्षेत्राचं नुकसान झालं असून, त्यापैकी मागील एका महिन्यातच 6 लाख 34 हजार एकर क्षेत्र बाधित झाले आहे. एकाही शेतकऱ्याचे एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्याविना राहणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
    Maharashtra Timesनंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    ई-पीक पाहणीला मुदतवाढ

    शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच विमा कंपन्यांना तातडीने मदत वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

    घर गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत

    ज्या शेतकऱ्यांचे शेत, घर किंवा छप्पर वाहून गेले आहे, अशांना जिल्हा प्रशासनाकडून गृहोपयोगी साहित्य, किराणा व तातडीची मदत पुरविण्याचे आदेश दिले असल्याचे भरणे म्हणाले.

    Maharashtra Timesविभक्त आई-वडिलांनी चार लेकींना नातेवाईकांकडे दिलं, नराधम दाम्पत्याकडून लैंगिक अत्याचार; पोलिस तपास करताना धक्कादायक प्रकरण समोर

    अतिक्रमणावर गंडांतर

    अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दाही त्यांनी हाती घेतला. “शासन गंभीर असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रशासन करेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

    शेतकऱ्यांचा कृषीमंत्र्यांना घेराव

    मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर आज अनेक मंत्री नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त करत कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर कृषीमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करून चांगलंच झापलं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा