• Sun. Jun 14th, 2026
    हेक्टरी ५० हजार मिळायला हवे, परभणीमध्ये अतिवृष्टीने शेतीचं नुकसान, शेतकरी गहिवरले!

    Maharashtra Times

    परभणी जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.मागील चार दिवसापासून तर एवढा पाऊस झाला की जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेलं आहे.तर दुसरीकडे सरकारने हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील राजेवाडी येथील शेतकऱ्यांची संवाद साधला.यावेळी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीपासून आत्तापर्यंत केलेल्या खर्चाची आकडेवारी सांगितली. एकरी 50 हजार खर्च आल्याने हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत म्हणजे….आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. राजेवाडीतील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी डॉ. धनाजी चव्हाण यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed