Maharashtra Politics : माझ्यासोबत ज्यांनी काम केलं, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी राजीनामा देताना म्हटले
मागील आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुजर यांनी आरोग्याच्या कारणांसह नव्या पिढीला संधी द्यावी या उद्देशाने पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना बाबा गुजर म्हणाले की, “मी गेली आठ वर्ष या पदावर काम केले. आता इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. पक्ष वाढीसाठी जो कोणी कार्यकर्ता प्रामाणिकपणे मेहनत करेल त्याचे मी नेहमीच अभिनंदन करीन. माझ्यासोबत ज्यांनी काम केले, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मी आभार मानतो.”
गुजर यांनी हा राजीनामा तडकाफडकी न देता मागील 15 दिवसांपासून वरिष्ठांना सांगितल्याचे स्पष्ट केले. “मी स्वतःच्या इच्छेने पद सोडत आहे. माझ्यावर कोणतीही नाराजी नाही, पक्षाविषयी कुठलीही खंत नाही. मी अजूनही पक्षाच्या कामासाठी सक्रिय राहणार आहे” असं त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षातील अलीकडील बदलांविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, शहराध्यक्ष पदावरून प्रशांत पवार यांना कमी करून अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी यामुळे आपल्यात कुठलाही असंतोष नाही. उलट प्रशांत पवार यांची टीम आता अनिल अहिरकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीला दुसरा धक्का, भाजपही पराभूत; तीन पक्षांच्या अपूर्व युतीसमोर शिंदे पुरुन उरले
“ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जो कोणी नियुक्त होईल त्याला मी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने मदत करेन. शेवटी पक्ष हाच महत्त्वाचा आहे,” असेही गुजर म्हणाले.
Ajit Pawar | धनंजय मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? भर भाषणात अजितदादा रोखठोकच बोलले
आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “जर वरिष्ठांनी प्रदेश स्तरावर मला काही जबाबदारी दिली तर त्या संधीचे सोने करून पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.” असेही बाबा गुजर म्हणाले.
Surendra Pathare : फडणवीसांचा पवारांना दे धक्का, बड्या नेत्याचा मुलगा भाजपात प्रवेश करण्याची चर्चा, पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलात बैठक
बाबा गुजर यांनी कबूल केले की, काही वेळा कार्यकर्त्यांनी मोठे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाही अशी तक्रार केली होती. मात्र, स्वतःला अशी कोणतीही खंत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मी स्वखुशीने राजीनामा दिला असून, हा निर्णय केवळ नवीन नेतृत्वाला वाव देण्यासाठी घेतला आहे,” असेही ते म्हणाले.

