Young Man Drowned Yeldari Dam : दुपारी तिघांचं पोहायला जायचं ठरलं, नियोजनाप्रमाणे गेले आणि एकाचवेळी तिघांनी उड्या घेतल्या. मात्र बाहेर निघताना दोघेच निघाले, धरणात काय घडलं जाणून घ्या.
याविषयी विस्तृत माहिती अशी की परभणी येथील करण जनार्धन अंभोरे (वय 19 वर्ष) प्रेम राहुल धाडवे व वीस वर्ष आणि सुरज सिद्धार्थ अंभोरे (वय 20 वर्ष) सर्वजण राहणार भारत नगर जिंतूर रोड परभणी हे तिघेजण काल सोमवारी दुपारच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून येलदरी धरणाकडे आले होते. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान या तिघांनी येलदरी धरण परिसरात वाहते पाणी पाहण्याचा आनंद घेतला. त्यानंतर या तिघांनाही नदीच्या वाहत्या पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. त्यांच्यासोबत कोणीही वडीलधारी मंडळी नसल्यामुळे तीनही मित्रांनी अल्लडपणामध्ये नदीपात्रात होण्याचा निर्णय घेतला. येलदरी जलाशयातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पूर्ण नदीपात्र काठोकाठ भरून वाहत आहे या पाण्याचा प्रवाह आणि त्याची खोली या तीनही मुलांना तेवढी माहीत नव्हती पण तरी देखील या तिघांनी पूर्ण नदीपात्रात उड्या घेऊन पोहण्याचा निर्णय घेतला.
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी मदत, परभणीला तब्बल 128 कोटींचा निधी मंजूर
तिघांनी एकदाच पूर्ण नदीपात्रात उड्या ठोकल्या त्यानंतर दोघेजण पोहत पोहत नदीपात्राच्या कडेपर्यंत पोहोचले आणि पात्राच्या बाहेर देखील निघाले. त्यावेळेस दोघांनी मागे वळून पाहिले असता आपला तिसरा मित्र सुरज अंभोरे कोठेच दिसत नाही. हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना अंदाज आला की सुरज हा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे, त्यानंतर त्यांनी जो जोरात ओरडून आवाज देण्याचा प्रयत्न केला पण मित्र मात्र कोठेही दिसत नव्हता. दोघांनी ओरडल्यानंतर जवळपास असलेले नागरिक जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले पण पाण्याचा एवढा प्रवाह होता की तेथे मात्र सुरज हा सापडलाच नाही.
Parbhanai Crime : दूध ठरलं मृत्यूचं कारण, पती-पत्नीमध्ये जोरांचं भांडण, शेतात गेल्यावर आजूबाजूला पाहिलं अन्… परभणीत काय घडलं?
दरम्यान, घटनेची माहिती कळल्यानंतर जिंतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड बीड जमादार सुनील राठोड नामदेव धोत्रे संतोष पैठणे आदींनी येलदरी जवळील पूर्णा नदीवर सदरील घटनेची पाहणी केली. दरम्यान पूर्णा नदी पात्रात सुरत चा शोध घेणे सुरू आहे पण अद्यापही त्याचा पत्ता लागला नाही. पोलीस प्रशासनाने तथा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सूचना करू नये युवकांच्या अशा अल्लडपणामुळे जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाभरात हळहळ देखील व्यक्त होत आहे.

