Maharashtra Weather Forecast : राज्यात २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव, संभाजीनगर, धाराशिवमध्ये २४ तासांत जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आला आहे.
राज्यात सातारा येथे पावसाची तूट आहे. सोलापूर, हिंगोली, धुळे, अमरावती, अकोला, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीहून कमी आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे २१ व २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांत १४३ मिलीमीटर पाऊस पडला. जेऊर येथे १०५, माढा येथे १२० मिलीमीटर पावसाची नोंद या २४ तासांमध्ये झाली. छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथे २०० मिलीमीटर, धाराशीवमधील भूम येथे १६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. २४ तासांमध्ये पडणाऱ्या या पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Koyna Dam : कोयना काठोकाठ; ‘महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असलेले धरण १०० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पाऊसमान
राज्यात १ जून ते २२ सप्टेंबर सकाळी ८.३० पर्यंत १२ टक्क्यांहून अधिक पाऊसराज्यात या कालावधीपर्यंत सरासरी ९५३.२ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र आत्तापर्यंत राज्यातील सरासरीने १ हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला
१ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ३४ टक्के पाऊस अधिक नोंदला गेला.
पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, वर्धा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून आत्तापर्यंत अतिरिक्त पाऊस
Nagpur Rain : अतिवृष्टीने शेकडो घरांचे नुकसान, 8 हजारहून घरं अंशत:, तर 132 घरं पूर्ण उद्ध्वस्त; नागपुरातील हृदयद्रावक चित्र
‘भरपाई दिवाळीपूर्वी’
इंदापूर : राज्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळाली नसताना सध्याही राज्याच्या विविध भागांत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमावेळी सांगितले.
शेती नुकसान पाहणीसाठी कृषीमंत्र्यांचा जिल्हा दौरा, पण शेतकऱ्यांना माहितीच नाही, काय घडलं?
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. त्यात मराठवाड्याला पावसाने झोडपले असून नद्या, नाल्यांना पूर आला आहे. विविध दुर्घटनांत चार जणांचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला बसला. बीड, जालना जिल्ह्यांतही जोरदार पाऊससरी बरसल्या.
छत्रपती संभाजीनगरमधील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे पथक बचावकार्य करत आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीनेही अनेक जणांचा बचाव करण्यात आला.

