पुणे गँगवॉर प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणाला आता नवं वळण येताना दिसत आहे. पोलिसांनी तपास केला असता बंडू आंदेकरने व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची खंडणी घेतल्याचं निषपन्न झालं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
आदित्य भवार, पुणे : पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार करुन हत्या करण्यात आली. आयुष हा अवघ्या 18 वर्षांचा विद्यार्थी होता. तो आपल्या लहान भावाला क्लासमधून घरी घेऊन आला होता. तो घराच्या खाली पार्किंगमध्ये आला. त्याने गाडी पार्क केली आणि तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर आयुष जमिनीवर धारातीर्थ पडला. त्याच्या लहान भावाने यावेळी आक्रोश केला. यानंतर त्याची आई, इतर कुटुंबिय आणि परिसरातील नागरीक तिथे आले. या घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला.
विशेष म्हणजे पुणे पोलिसांना हत्येच्या काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आंदेकर टोळीच्या आरोपींना पोलिसांनी रेकी करताना रंगेहातदेखील पकडलं होतं. पण बंडू आंदेकर हा स्वत:च्याच नातवाला संपवेल, अशी कल्पना पोलिसांनादेखील नव्हती. त्यामुळे पोलीस देखील या घटनेने अवाक झाले. या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपासून बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे, अशी चर्चा आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे. पोलीस तपासातून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.
बंडू आंदेकरने 20 कोटींची खंडणी घेतली
या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे. बंडू आंदेकर याने व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 कोटींची खंडणी घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता इत्यंभूत तपास केला जात आहे. पोलीस या प्रकरणी आता वेगवेगळ्या अँगलने तपास करताना दिसत आहेत. त्यामुळे आंदेकर टोळीचे सर्व कूकृत्य उघड होण्याची शक्यता आहे. पुणे गँगवॉर : ‘मलाही गोळ्या घाला’; गणेश कोमकर मुलाच्या अंत्यविधीला धायमोकलून रडला, पुत्राला अग्नीडाग देताना म्हणाला…
पोलिसांच्या तपासात काय उघडकीस आलं?
गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मच्छि मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा