• Sun. Mar 15th, 2026
    Jalgaon News : शेतातून परतताना नदीचा प्रवाह वाढला, मामीसह भाची पाण्यात बुडाले, मामीला वाचवण्यात यश, पण…; नातीच्या दु:खाने आजोबांचा मृत्यू

    Jalgaon 15 Year Old Girl Drowns in River : राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी देखील झाली आहे. अशीच अतिवृ्ष्टी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झाली आहे. मात्र, यावेळी नदीच्या पाण्यात एक 15 वर्षीय मुलगी वाहून गेली आहे.

    पाचोरा १५ वर्षीय मुलगी नदीत बुडाली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : सध्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं अनेक शेतकऱ्यांचे जनावरं पाण्यामध्ये वाहून गेली. आज देखील पाचोरा तालुक्यातील वडगाव (Vadgaon) गावात पाऊस झाल्याने हिवरानदी नदीला पुर आला आहे. या शेतातून परत येत असताना मामी आणि भाची दोघंही वाहून गेले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुदैवाने 35 वर्षीय मामीला वाचण्यात यश आलं असून यात 15 वर्षीय भाची वाहून गेली आहे.

    नेमकं काय घडलं?

    पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात आज शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास निकिता भालेराव (वय 15) आणि तिची मामी सरला खरे (वय 35) या दोघी शेतातून परत येत होत्या. हिवरानदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं दोघी वाहू लागल्या. परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत सरला खरे यांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र निकिता पुराच्या पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तीन तासांपासून निकिताचा शोध सुरू आहे.
    Maharashtra Timesरेल्वेस्थानकाजवळ उभा होता, अचानक डेमो पॅसेंजरसमोर उडी घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं; छ.संभाजीनगरमध्ये हळहळ

    नातीच्या दुःखाने आजोबांचा मृत्यू

    एकीकडे निकिताचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे ही बातमी निकिताच्या 65 वर्षीय आजोबा श्यामराव खरे यांना कळली. नात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा मोठा धक्का त्यांना बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकाच कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळलं असून, वडगाव टेक गावात शोकाकूल वातावरण आहे.

    Maharashtra TimesHingoli News : मित्रांसोबत पोहायला जाणं पडलं महागात, खोल पाण्यात पडला अन्…; दुसऱ्या दिवशी रामाचा शोध लागला

    घटनेच्या दोन तासानंतर प्रशासन मदतीला

    दरम्यान, दुपारपर्यंत घटनास्थळी दोन तासानंतरही कोणतीही शासकीय मदत पोहोचलेली नव्हती. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पावसामुळे नदीला पूर आलेला असून अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन सज्ज नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. या घटनेची माहिती निकिताच्या आजोबांना कळताच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्यामुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांचा वापर करून वाहून गेलेल्या निकिताचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा