मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली शहरांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का? याबाबतही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रदीप भणगे, कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. निवडणुकीआधीच मतदार याद्यांवर काम सुरू करा, बोगस मतदारांची नावे शोधा, बीएलओशीं संवाद ठेवा. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत, वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, याबाबत बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. जे सोडून गेले ते आपले नव्हते, असंही राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.त्यामुळे नव्या उत्साहाने कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी अंबरनाथ आणि कल्याणमध्ये सांगितले.
अंबरनाथ येथील मनसे पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी कामाला लागण्याचा आदेश दिला. निवडणुकीच्या कामाला लागा. युती, आघाडी की बाकी काय करायचं ते नंतर सांगतो. मनसेची आपली ताकद आहे. ती आणखी बळकट कर. निवडणूक याद्यांवर आहे काम करा.. बूथ टू बूथ माणसे निवडा. त्यावर काम करा, मतदार याद्या वारंवार चाळा, अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
राज ठाकरेंची स्वाक्षरी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी
अंबरनाथमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी अंबरनाथ येथील मनसे विद्यार्थी सेना शाखेवर सर्वात आधी राज ठाकरे यांनी भेट दिली. राज ठाकरे यांनी कार्यालयाची पाहणी केली आणि त्यांनी शाखेच्या मस्टरवर सही करत ठाकरे स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांची स्वाक्षरी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे राज ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्यावेळी या गर्दीत आरोही नावाची मुलगी होती. ती राज ठाकरे यांना सारखी बोलावत होती, तिला त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा होता. शेवटी खाली इमारतीच्या पायऱ्यांवर राज ठाकरे या चिमुरडीसाठी थांबले आणि त्यांनी आरोहीला बोलावून घेतलं आणि तिच्यासोबत फोटो काढला. आरोही धावत जाऊन राज ठाकरेंच्या समोर उभी राहिली. राज यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली हे पाहून चिमुरडीच्या चेहऱ्यावर आनंद झाला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा