• Sat. Mar 7th, 2026
    Ratnagiri Crime : गाडीचा पाठलाग करत धडक दिली, भरपाईची मागणी करत गाडीत कोंबलं; रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मालकाला लुटलं

    Ratnagiri Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय केतकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    संगमेश्वर केतकर ज्वेलर्स मालक हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri Crime) जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर (वय 63) यांच्यावर बुधवारी रात्री 10.00 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. साखरपा देवरुख मार्गावरील वांझोळेपासून एक किलोमीटर अंतरावर काही अज्ञातांनी त्यांचं अपहरण करून त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Dhananjay Ketkar Owner of Ketkar Jewellers)

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय केतकर हे रात्री साखरपा येथून घरगुती कार्यक्रम आटपून देवरुख येथे जात असताना वांझोळे येथून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. पाठलाग करताना गाडीला गाडी घासल्यामुळे वाटेतच गाडीची नुकसान भरपाई ते मागू लागले. याच गडबडीत केतकर हे गाडीतून उतरताच त्यांच्या अंगावर बुरखा टाकून त्यांना जबरदस्तीनं हल्लेखोरांनी आपल्या गाडीत कोंबलं. त्यानंतर वाटूळजवळ आणलं आणि मोठ्या रकमेची मागणी केली. त्यांच्याजवळील सुमारे 15 लाखांचे दागिने आणि 20 हजारांची रोख रक्कम काढून घेतली आणि केतकर यांना चेहऱ्याला व अन्य ठिकाणी मारहाण करून सोडून दिलं.

    Maharashtra TimesJalgaon News : पंचाहत्तरीच्या आजारी लेकाला भेटली, 95 वर्षीय आईने प्राण सोडले, माऊलीच्या अस्थीविसर्जनानंतर मुलाने घेतला जगाचा निरोप

    या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तपासाची चक्रे फिरवण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोर यांच्या विरोधात संहिता 2023चे कलम गुन्हा 311, 309 (4), 310 (1), 140 (2), 127(2), 115(2), 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी भेट दिली आणि केतकर यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी या व्यापाऱ्याने आपल्याला तब्बल 10 जणांनी घेरल्याची धक्कादायक माहिती दिली.

    Maharashtra TimesMumbai News : हृदयद्रावक! चौथ्या मजल्यावरुन चिमुकला खाली पडला, हॉस्पिटलमध्ये नेताना अ‍ॅम्ब्युलन्स 5 तास ट्रॅफिकमध्ये; लेकरानं वाटेतच प्राण सोडला

    कॉलेजहून परतणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा हृदयद्रावक अंत

    मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथे आयटीआयचे शिक्षण घेणारा विद्यार्थी शिवम गोताड याचा जागीच मृत्यू झाला आहे. हातखंबा येथील हायस्कूलजवळ असलेल्या तीव्र उतारावर कोळशाने भरलेल्या कंटेनरने मागून येऊन जोरदार धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात शिवमचा मित्र निशांत कळंबटे , वय 20 वर्ष, झरेवाडी, रत्नागिरी, याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा