Ghodbunder Road: घोडबंदर रोडच्या सेवा रस्त्याच्या विलनीकरणासाठी शिवसेना आग्रही होती. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केले होता.
‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून घोडबंदर रोड वरील दोन्ही बाजूचे सेवारस्ते मुख्य रस्त्याशी जोडून काँक्रीटीकरण केले जात आहे. या कामामुळे मूळ ६० मीटर रुंद असलेल्या घोडबंदर रोडची रुंदी वाढणार असून अधिक प्रशस्त रस्ता वाहनचालकांना मिळण्याचा दावा ‘एमएमआरडीए’कडून केला जात आहे. परंतु सेवारस्ता जोडण्याच्या अट्टाहासामुळे लोकांच्या सुरक्षेचा व सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील दहा मोठ्या गृहनिर्माण सोसायटी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी रविवारी हिरानंदानी पार्क येथील सभागृहात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन हजारो नागरिकांतर्फे निवेदन दिले.
Mumbai Metro: महानगर प्रदेशात डोक्यावर टांगते ‘रॉड’; बांधकाम साहित्य कोसळण्याच्या घटनांमुळे मेट्रो मार्गांखालील प्रवासावर भीतीची छाया
निधीचा अपव्यय
मेट्रो, उन्नत मार्ग, कोस्टल रोड यासारखे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथील अवजड वाहनांची वाहतूक कमी होऊन हा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’कडून खर्च होणारा कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची आवश्यकता आहे.
हा निधी रस्त्यांवरील खड्डे बजवण्यासाठी आणि रस्ता रहिवाशांच्या मजबुतीकरणासाठी खर्च करावा. यासंदर्भात शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून देण्यात येईल. तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आश्वासन आ. केळकर यांनी रहिवाशांना दिले.
कट रचला, 7 जणांनी मिळून भाजप युवा मोर्चाच्या बड्या नेत्यासह चुलत भावाला संपवलं, ठाणे पोलिसांकडून मोठी कारवाई
भाजप-शिवसेनेत संघर्ष ?
शिवसेना उबाठा पक्षाकडून सुरुवातीला या प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेत ‘एमएमआरडीए’कडे पत्रव्यवहार केला होता. आता या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून होणारा विरोध लक्षात घेत भाजपनेही या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर अविनाश जाधव आणि राजन विचारेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप
घोडबंदर रोडचा सेवारस्ता अतिक्रमणांनी व्यापलेला असून त्यावरील अडथळ्यांमुळे वाहनकोंडीत भर पडते. वाहतूक पोलिसांनी ही कोंडी दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी या एकत्रीकरणाला समर्थन दिले आहे.
अटीचाही भंग
महामार्गाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी रहिवाशांच्या हरकती, आक्षेप आणि सूचना मागवण्याची आवश्यकता होती. विशेष म्हणजे महापालिकेकडून या भागातील बांधकामांना परवानगी देताना परिसरात सेवारस्ता उपलब्ध असण्याची अट घालण्यात आली आहे. या अटीचाही भंग यामुळे होणार आहे.

