• Fri. Mar 6th, 2026

    Jalgaon Crime : ‘माझ्याकडे पाहून का थुंकला?’, दोन कुटुंबांमध्ये बेदम मारहाण, एकाचा जागीच मृत्यू; जळगावमध्ये खळबळ

    Jalgaon Crime : ‘माझ्याकडे पाहून का थुंकला?’, दोन कुटुंबांमध्ये बेदम मारहाण, एकाचा जागीच मृत्यू; जळगावमध्ये खळबळ

    Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. जळगावमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्तीची हत्या झाली आहे. दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले आहेत.

    बिलवाडी मारहाणीत एकाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : सध्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यामध्ये फुलांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोन दिवसापूर्वीच भुसावळ येथे भाचीच्या घरचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मामाला जावयाने चाकूने सभासप वार करून ठार केले होते. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच आता जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून इसमाचा खून करण्यात आला आहे. दिवसेंदिवस जळगाव जिल्हा आता गुंडशाहीकडे वळत आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. (Murder)

    जळगावच्या बिलवाडी गावात आज जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबांतील एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

    Maharashtra Timesबीड अन् नगरमध्ये आभाळ फाटलं; अनेकजण पुरात अडकल्याने बचावासाठी थेट हेलिकॉप्टर आणलं, धडकी भरवणारा VIDEO

    गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून बाचाबाची केली होती. त्यानंतर काल रविवारी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि “माझ्याकडे पाहून का थुंकला?” या कारणावरून वाद चिघळला. लाकडी दांडे, पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला.

    जखमींमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत रुग्णालयात संताप व्यक्त केला. “जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती रुग्णालयात गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

    Maharashtra TimesNashik Crime : अनैतिक संबंधातून वाद, तरुणाने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढला, संतोष रात्रभर…

    कौटुंबिक वादातून मामसासऱ्याची हत्या

    जळगाव जिल्ह्यातही आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातल्या त्यात बऱ्याच महिन्यांपासून भुसावळ शहरामध्ये देखील खुनाच्या घटनांना आळा बसला होता. मात्र, काल पुन्हा भुसावळ शहर पुन्हा एका हत्येनं हादरलं आहे. भुसावळ शहर नेहमीच गुन्हेगारीमुळे चर्चेत राहत असतं. अनेकवेळा या ठिकाणी दिवसाढवळ्या खून झालेले आहेत. काल अशीच एक घटना भुसावळ शहरात घडली, त्यात मामसासऱ्यावर चाकूने वार करून ठार करण्यात आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा