अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा पार पडला.यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाणांनी आरक्षणाबाबतही मत मांडले.आरक्षणाचा विषय सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचं ते म्हणाले.यावेळी त्यांनी २०१० साली आपल्यावर खोटे आरोप झाल्याचा उल्लेख केला.कुठलीही चूक नसताना १४ वर्ष वनवास भोगावा लागला, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.