• Mon. Mar 16th, 2026
    युतीच्या चर्चेत राज ठाकरेंचं पारडं जड? उद्धव ‘दादू’ बॅकफूटवर जाण्याची चिन्हं, तो मुद्दा ठरणार गेमचेंजर

    Raj Thackeray : अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे मराठी मतांसाठी त्यांना राज ठाकरेंच्या मदतीची गरज आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

    मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती निश्चित मानली जात आहे. मात्र या युतीमध्ये राज ठाकरे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची अवस्था सध्या नाजूक आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट दिवसेंदिवस खिळखिळा होताना दिसतो. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंना केवळ 20 जागा मिळाल्या. गेल्या तीन वर्षात अनेक बडे नेते, माजी मंत्री-आमदार यांच्यापासून माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे मराठी मतांसाठी त्यांना राज ठाकरेंच्या मदतीची गरज आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

    बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने जवळपास तीन दशकं मुंबई महानगरपालिकेवर (BMC) निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या अगदी जवळ पोहोचली, त्यामुळे शिवसेनेचं वर्चस्व एकहाती नसल्याचं दिसून आलं. त्यावेळी राज्यात युती असतानाही भाजपने विरोधी बाकावर बसून शिवसेनेला महापालिकेचा कारभार हाती घेऊ दिला. परंतु शिवसेनेला अनेक मुद्द्यांवर घेरण्याचाही प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे आशियातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला ‘दुभती गाय’ किंवा ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी’ मानतात, असा आरोपही विरोधकांनी केला होता.

    एकीची नांदी कुठून?

    19 एप्रिल रोजी चित्रपट निर्माते-अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये राज ठाकरे म्हणाले होते की, “मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मी सर्व काही विसरण्यास तयार आहे.” त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनीही मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दर्शवली. 20 एप्रिल रोजी संजय राऊत यांनी या भेटीला “भावा-भावांमधील भावनिक संवाद” असे म्हटल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले.

    दरम्यान, शाळांसाठीच्या त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत जोरदार विरोध दर्शवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने जीआर मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी जुलैच्या सुरुवातीला एकत्र विजय रॅली काढली. यामुळे ठाकरे कुटुंबातील मतभेद कमी झाल्याचे संकेत मिळाले.

    27 जुलै रोजी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी भेट दिली. तर गेल्याच आठवड्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची ‘शिवतीर्थ’वर बैठक झाली.

    उद्धव ठाकरेंनी 2017 मध्ये मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले, ज्यामुळे राज ठाकरे कमजोर झाले. आता उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या शहरी मराठी मतांची गरज आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचा युतीमध्ये वरचष्मा दिसत आहे.

    एका राजकीय विश्लेषकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “उद्धव ठाकरेंना मराठी मतांची गरज असल्याने युतीत राज ठाकरेंना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एका मनसे नेत्याने सांगितले की, “उद्धव ठाकरेंचा पक्ष नाजूक स्थितीत आहे, हे माहीत असल्याने राज ठाकरे मजबूत स्थितीतून वाटाघाटी करत आहेत.”

    उद्धव ठाकरे नाही ‘या’ ठाकरेंमध्ये होतो बाळासाहेबांचा भास, स्पष्टच बोलल्या अयोध्या पौळ

    दरम्यान, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी बीएमसी निवडणुकीतील जागावाटपावर सुमारे अडीच तास चर्चा केली. मात्र संजय राऊत यांनी या भेटीला ‘कौटुंबिक भेट’ असे म्हटले. राऊत नेहमीच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगत आले आहेत.

    विश्लेषकांनी सांगितले की, “राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन तास घालवल्यानंतरही राऊत यांनी या भेटीला कौटुंबिक भेट म्हटले, याचा अर्थ राज ठाकरे यांनी काहीतरी मजबूत भूमिका घेतली असावी, ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष बॅकफूटवर गेला आणि राऊत यांना या भेटीला कौटुंबिक भेट म्हणावे लागले. यामुळे उद्धव ठाकरे अधिक अडचणीत आले आहेत, असेही ते म्हणाले.
    Bapu Bhegade : भाजपने गेम फिरवला, अजित पवारांना होमपिचवरच धोबीपछाड, पुण्यातील चर्चेतला नेता ‘कमळ’ हाती धरणार
    माजी पत्रकार संदीप आचार्य यांनी सांगितले की, “दोन्ही चुलत भावांना एकमेकांची गरज आहे, त्यांचे बहुतेक समर्थक एकसारखे आहेत. उद्धव यांनी राज यांच्याकडे मदतीसाठी याचना केली आहे. हे खरे आहे की दोघांनाही एकमेकांची गरज आहे, पण त्यांचा बहुतेक मतदार समान आहेत. जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरु शकतो आणि राज निश्चितपणे त्यांच्या पक्षासाठी चांगला वाटा मागतील.”

    असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा राज यांनी उद्धव यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण उद्धव यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, याकडेही आचार्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे राज यांचे मोठे नुकसान झाले. या सर्व गोष्टींचा आताच्या चर्चेतही परिणाम होईल. उद्धव यांना हेदेखील लक्षात घ्यावे लागेल की राज यांच्यासोबत युती केल्याने त्यांना काही प्रमाणात मते मिळतील, पण मुस्लिम आणि गैर-मराठी भाषिकांचा पाठिंबा गमवावा लागू शकतो, ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मतदान केले होते.”
    Maharashtra TimesHaresh Keni : कान भरले की स्पष्टीकरण मागायचे, नाराज नेत्याचा भाजपला रामराम, फक्त दोन ओळींचा राजीनामा पाठवला
    दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी या घडामोडींना निवडणुकीच्या निकालांत फारसे महत्त्व मिळणार नसल्याचे म्हटले आहे. आशिष शेलार यांनी वरळीतील रॅलीला ‘कौटुंबिक पुनर्मिलन’ असं संबोधलं, तर दरेकर म्हणाले की, या घटनांवरून उद्धव ठाकरेंची ‘असहायता’ दिसून येते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *