Vasai and uUttan Ddongri Ro-Ro Service : मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होत आहे. वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तन डोंगरी येथे रो-रो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात येणार आहे. या जेट्टीसाठी मंजुरी मिळाली आहे. याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.
राज्याच्या किनारपट्ट्या प्रवाशांसाठी समुद्रीमार्गे जोडण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी मंडळ करत आहे. त्या अंतर्गत किनारपट्ट्यांवर जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्यातच उत्तन डोंगरी व नागला बंदर येथे रो-रो सेवेच्या दृष्टीने जेट्टी उभारण्यास किनारपट्टी नियमन क्षेत्रासंबंधी महत्त्वाची मंजुरी मिळाली आहे.
Mumbai AC local Train : लोकलचे मालडब्बेही AC होणार, स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणेचं नियोजन; कशी असणार सुविधा?
या अंतर्गत नागला बंदर व उत्तन या दोन्ही ठिकाणी १४३ मीटर लांब व १० मीटर रुंदीच्या जेट्टी उभारल्या जाणार आहेत. या जेट्टी सर्वाधिक लांबीच्या असून रो-रोसारखे मोठे जहाज तेथे उभे राहू शकेल. त्याच वेळी या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून जलप्रवासाच्या दृष्टीने मोठे केंद्र उभारले जाणार आहे. यासाठीच जेट्टींशिवाय वाहनतळ, बोटीत चढण्यासाठीचा मार्ग, संरक्षक भिंत यांचेही बांधकाम होणार आहे. त्यामध्ये नागला बंदर येथे २,०२५ चौरस मीटर, तर उत्तन डोंगरी येथे ७,२०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाहनतळ, नागला बंदर येथे ४५.४२ मीटर उंचीची, तर उत्तन डोंगरी येथे ६० मीटर उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
पनवेल-बोरिवली-वसईमार्गे लोकलची नवी मार्गिका; विरारपर्यंत खास लाइन, नव्या कॉरिडोरचा कसा होणार फायदा?
या सर्व बांधकामाला महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) सीआरझेडसोबत कांदळवनांसंबंधीच्या उपाययोजना करण्यासह मंजुरी दिली आहे. तसेच अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
ठाणे, नवी मुंबईतही नियोजन; नवी मुंबई-ठाणेकरांना कसा होणार फायदा
– महाराष्ट्र सागरी मंडळाने ठाणे व नवी मुंबई परिसरातही चार जेट्टी बांधण्याचे नियोजन केले आहे.
– त्यामध्ये वाशी, ऐरोली, मुलुंड मिठागर परिसर व ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्याजवळील मीठबंदर यांचा समावेश आहे.
– त्याठिकाणी वन विभागाची परवानगी नसल्याने तो प्रस्ताव एमसीझेडएमएने अद्याप मंजूर केलेला नाही.
– हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, नवी मुंबई, वसई ते मुंबईची उत्तर-पश्चिम किनारपट्टीही एकमेकांशी जलमार्गे प्रवासी वाहतुकीने जोडली जाऊ शकेल.
मंत्रालयाच्या संबंधित प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

