Onion Farmer : कांदा लिलावावेळी अस्थिर दरपद्धतीने संताप व्यक्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. नाशिक-छत्रपती महामार्गावर रास्ता रोको केला.
सुरुवातीला एका शेतकऱ्याच्या कांदा गोल्टीला व्यापाऱ्यांनी २०० रुपये प्रति क्विंटल भाव दिल्यानंतर क्षणात तोच दर १५० रुपयांवर आणल्याने शेतकऱ्यांचा संताप झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत लिलाव प्रक्रिया बंद पाडली. त्यानंतर बाजार समिती प्रवेशद्वारासमोरच नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी अर्धातास रास्ता रोको केला.
Nashik Crime: भयंकर! गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवलं; बॉडी बघून पोलिसांच्याही अंगावर काटा, नाशिकमध्ये खळबळ
शनिवारी सकाळच्या सत्रात कांदा लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू असताना व्यापाऱ्यांकडून गोल्टी कांद्याला सुरुवातीला २०० रुपये प्रति क्विंटल दर पुकारण्यात आला. त्यानंतर काही क्षणातच हा दर १५० रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडून रास्ता रोको करीत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. परिस्थिती चिघळू नये म्हणून बाजार समितीचे संचालक छबूराव जाधव व लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली. अर्ध्या तासानंतर शेतकऱ्यांनी रास्तारोको मागे घेतला.
Chhagan Bhujbal: EWS 10 टक्के आरक्षण नको का? मराठा नेत्यांनी उत्तर द्या; आरक्षण मुद्यावरुन छगन भुजबळांचा संताप
शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाढा
शेतकऱ्यांनी आंदोलनानंतर बाजार समितीत एकत्र येऊन व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल तक्रारी केल्या. व्यापारी सुरुवातीला जास्त भाव पुकारून नंतर दर पाडतात, लिलाव झालेल्या मालात तक्रारी काढतात, मालाचे वेळेवर पैसे देत नाहीत, तसेच लिलावाच्या वेळी खाली पडलेल्या कांद्याबाबत कर्मचार्यांकडून अधिक पैसे मागितले जातात आदि तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केल्या. ‘यापुढे शेतकऱ्यांच्या प्रत्येक तक्रारींवर ठोस कारवाई केली जाईल. गैरप्रकार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील’, असे संचालक छबूराव जाधव यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

