Sharad Pawar on India Vs Pakistan Asia CUP : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून महाराष्ट्रात भाजपवर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माझा देश, माझं कुंकू असं आंदोलन छेडलं. मात्र, शरद पवारांनी या विषयावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.
देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने नाशिकमध्ये अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पक्षाच्या पुढील वाटचालीची आखणी केली जाणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. शेतकरी प्रश्नांवरुन त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर, विशेषतः कांदा निर्यात बंदीवर, आरक्षण, केंद्र सरकार तोडगा काढत नाहीये, असे सांगत या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ajit Pawar : एक मिनिटं…! ”आम्ही राहायचं की नाही’; त्रस्त पुणेकर महिलेचा थेट अजित पवारांनाच सल्ला, दादा म्हणाले…
राज्यातील सामाजिक ऐक्याला तडा अन् पवारांची खंत
राज्यात सध्या निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले की, सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे, पण आता त्याला तडा जात आहे. समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी सरकारला व्यापक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. “हे याच्यासाठी, ते त्याच्यासाठी असे सरकार म्हणून योग्य नाही. सरकार एका जातीचे किंवा समाजाचे नसते, ते सर्वांचे असते,” असे ते म्हणाले. वेगवेगळ्या समाजाच्या समित्या बनवण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एका जातीच्या समित्या नसाव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आणि मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना, त्यांना सामाजिक ऐक्य हवे असून, त्यासाठी व्यापक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदा दर घसरल्याने संताप; नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
राजकीय मुद्द्यांवर शरद पवारांची रोखठोक मते
छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, आम्ही एका जातीचे राजकारण करत नाही. समाजात दुरावा निर्माण होईल असे भाष्य करणे योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
Maratha Vs OBC Reservation : भुजबळ कोर्टात गेले तर आम्ही ९४ सालच्या GR ला आव्हान देणार- मनोज जरांगे
मोदींचा मणिपूर दौरा
पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, ”ते मणिपूरला गेले, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची मागणी होती,” असे त्यांनी सांगितले.
यात तथ्य नाही
शरद पवारांनी मनोज जरांगे यांना पुढे केलं या चर्चांवर बोलताना पवार म्हणाले, मनोज जरांगे यांच्यासोबत आमचा कोणताही संबंध नाही. कुणी काही म्हणत असेल तर त्यात काहीही तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

