Baramati News : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला फोन कॉल व्हायरल झाला होता. यावर बोलताना शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी आपलं मत मांडतना जे झालं ते चुकीचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीत आज जनता दरबार घेतला. याच दरम्यान त्यांनी पत्रकाराची संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणालाही अशा प्रकारचे संभाषण आवडणार नाही. मलाही ते आवडले नाही. शेवटी ते एक आयपीएस ऑफिसर आहेत. त्यातही त्या महिला आहेत. तुम्ही काय बोलताय. कशासाठी बोलताय हे तुम्ही पाहिले पाहिजे, जे झाले ते चुकीचे झाले, असे युगेंद्र पवार यांनी नमूद केले.
Pune News : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला लक्ष्मी रोडवर ‘या’ पाच चौकात रात्री DJ चा दणका, शंभर डेसिबलपेक्षा अधिक आवाज, कोणत्या जाणून घ्या
काही दिवसांपूर्वी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतील विधानसभा निवडणूक मी अजित पवारांच्या विरोधात लढणार नाही असे म्हटले होते. याबाबत युगेंद्र पवार यांना विचारले असता, युगेंद्र पवार म्हणाले, ही सारी मुलाखत व्यवस्थित कोणीही पाहिलेली नाही. अर्धवट वक्तव्यावर चर्चा केलेली आहे. खरे तर या व्यतिरिक्त खूप संभाषण माझे त्या ठिकाणी झालेले आहे. परंतु ते सोडून फक्त एकाच वाक्यावर बाहेर बोलले गेले. मला जे सांगायचे होते ते तिथे सांगितले! मी एक तासभर त्या पोर्टलशी बोलत होतो. त्यामुळे मला विचारण्यात आलं की, कुटुंबात ही निवडणूक झाली किंवा कुटुंब वेगळे झाले. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर मी बोलत होतो की, कोणालाही ते आवडत नाही कुटुंबात भांडण झालेले. सगळ्यांना त्याचा त्रास होतो आम्हालाही त्याचा त्रास झाला. दादा देखील स्वतः बोललेले आहेत की, त्यांची ती चूक झाली. मग त्या ठिकाणी मी बोललो होतो की, त्यांच्याकडून ती चूक झाली. आमच्याकडून पण विधानसभेला ही चूक झाली. कुठल्याही कुटुंबात जर दोन गट तयार होत असतील तर ते कोणालाच आवडत नाहीत, असं पडकर यांनी म्हटलं आहे.
Ashwini Kedari : उकळतं पाणी अंगावर पडून घात! PSI परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम, हरहुन्नरी अश्विनी केदारींचा अकस्मात मृत्यू
कुठेतरी असले राजकारण थांबले पाहिजे. मग आमचे कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक कुटुंब जे राजकारणामुळे एकमेकांपासून थोडे दूर गेले आहेत. वैचारिक दृष्ट्या एकमेकांपासून लांब गेले आहेत. असे कुठेही झाले नाही पाहिजे. असे मी म्हणालो होतो. त्याचबरोबर असेही म्हणालो होतो की, मी काम करत राहणार आहे. मी बारामती सोडून जाणार नाही. बारामती माझे घर आहे. त्यामुळे माझे काम पाहून लोकांनीच निर्णय घेतला. तर लोकच मला निवडणुकीला उभे करू शकतील आणि निवडून देतील असे मी म्हणालो होतो. मात्र त्याऐवजी एकाच वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचं युगेंद्र पवार म्हणाले.

