• Sun. Mar 15th, 2026
    PMP बसचालकांना आता ‘हा’ नियम पाळावाच लागणार; अन्यथा थेट निलंबनाची कारवाई, जाणून घ्या

    PMP Bus Pune: पीएमपी प्रशासनाकडून बसचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नियम न पाळल्यास थेट निलंबित केलं जाणार आहे.

    pmp bus AI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस चालवताना मोबाइल व हेडफोन वापरल्याचे आढळून आल्यास चालकावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. चालकांना कामावर जाण्यापूर्वी आपला फोन जमा करावा लागणार आहे. हा नियम खासगी ठेकेदारांच्या चालकांनादेखील लागू असणार आहे.

    पीएमपीचे चालक बस चालवताना मोबाइलवर बोलत असल्याचे व हेडफोन लावत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या; तसेच काही जण बस चालवत असताना मोबाइलवर गाणी ऐकणे, अथवा पहात असल्याचे प्रकार समोर आले होते. अशा प्रकारामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता चालकाने कामावर जाताना वाहकाकडे मोबाइल जमा करावा; तसेच काम संपल्यावर वाहकांकडून मोबाइल परत घ्यावा, असा आदेश पीएमपी प्रशासनाकडून काढण्यात आला आहे.
    Maharashtra TimesPune Gang War: जशी आंदेकरांची हत्या, आयुष कोमकरलाही तसंच संपवलं, नऊ गोळ्यांनी शरीराची चाळण, जर्किन चिंधड्या-चिंधड्या झालं
    पीएमपीच्या नुकतेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पीएमपीकडून सर्व चालकांना याबाबत आदेश देण्यात आले आहे. या नियमांची अंमलबजाणी काटेकोरपणे करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिले आहेत.
    Maharashtra TimesPune News : शनिवारवाडा ते स्वारगेटदरम्यान दोन भुयारी मार्ग, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत; कसा-कुठे असेल मार्ग?
    चालकांसाठी या आहेत सूचना…
    चालकांनी कामावर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाइल ‘शेड्यूल’ वरील वाहकांकडे जमा करणे बंधनकारक आहे.
    चालकाची ड्युटी संपल्यानंतर मोबाइल परत करण्यात येईल.
    चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.
    आगार व्यवस्थापकांनी आपल्या आगारातील खासगी बस पुरवठादारांनाही या सूचना द्याव्यात .

    पीएमपीच्या प्रवास संख्येत घट
    गणेशोत्सवात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून एक कोटी आठ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रवासी संख्येत २० लाखांनी घट झाल्याचे दिसत आहे. यंदा पीएमपीने तिकीट दरांत वाढ केल्यामुळे प्रवासी संख्येला फटका बसला आहे. मात्र, प्रवासी घटले असले, तरी तिकीट दरवाढीमुळे पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यंदा गणेशोत्सवात पीएमपीला २१ कोटी ९९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे .

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा