• Mon. Mar 9th, 2026

    ‘दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्यानं मृत्यू’, रुग्णालयाचं स्पष्टीकरण, ‘हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमचं लेकरु गेलं’, कुटुबीयांचा आरोप; नेमकं काय घडलं?

    ‘दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्यानं मृत्यू’, रुग्णालयाचं स्पष्टीकरण, ‘हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमचं लेकरु गेलं’, कुटुबीयांचा आरोप; नेमकं काय घडलं?

    Thane Baby Dies Vasant Valley Maternity Hospital : कल्याणमधील वसंत व्हॅली प्रसुतीगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलदर्जीपणामुळे हे झालं असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

    वसंत व्हॅली प्रसुतीगृह बाळाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदीप भणगे, ठाणे : कल्याणमध्ये केडीएमसीच्या वसंत व्हॅली प्रसुतीगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ एक दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाला असून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असून, तीन दिवसाचा ऑक्सिजन देणार असल्याचं सांगत एकही दिवस न दिल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय. या प्रकरणानंतर संतप्त नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला त्याचबरोबर संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा देखील दिला आहे.

    या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनानं आपला निष्काळजीपणा नसल्याचं सांगत ‘बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्यानं मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करत बालिकेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे, त्यानंतर सत्य बाहेर येईल,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    Maharashtra Timesसर्वात मोठी बातमी! लालबागच्या राजाचं विसर्जन आणखी काही तास रखडणार, आता रात्रीच बाप्पाला निरोप

    बाळाच्या मृत्यूनंतर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून त्यांनी कल्याण डोबिंवली महानगरपालिका प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केलाय. दरम्यान, बाळाचा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलं आहे.

    एसटी बसचा भीषण अपघात!

    कल्याण एसटी आगाराच्या बसेसच्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बसचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघाताला काही आठवडे उलटत नाहीत, तोच आज सकाळी पुन्हा एकदा बसचा स्टेअरिंग रॉड तुटून अपघाता झाला. यावेळीही बस झाडाला धडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी एसटी प्रशासन सुरक्षेत सुस्त कारवाई करत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

    Maharashtra TimesPune Komkar Gangwar: वर्षभरापूर्वीच कट रचला, चौघांनी एकट्याला गोळ्या घातल्या; आयुष कोमकर हत्या प्रकरणाची इनसाईड स्टोरी

    आज सकाळी कल्याण आगाराची ही बस सुमारे 20 ते 25 प्रवाशांना घेऊन माळशेज मार्गे आळेफाटा येथे निघाली होती. मात्र मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळून ही बस जात असताना अचानक बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली. आणि रस्त्याशेजारी झुडपांमध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक दिली. ज्यामध्ये बसच्या उजव्या भागाचे काही नुकसान झाले आणि बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर वाहकालाही मुका मार लागल्याचे सांगण्यात येत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा